डहाणू (वार्ताहर) : डहाणू तालुक्यातील वरोर येथील रहिवासी असलेल्या व सध्या नेरूळमध्ये वास्तव्यास असलेला शुभम वनमाळी ह्याने समुद्रातून बोर्डी ते डहाणूपर्यंत अंतर नुकतेच पोहून (swim) पार केले.
याआधी देखील शुभम ने मुंबई ते डहाणू हे अंतर पोहून विक्रम आपल्या नावे नोंदवला होता. येत्या महिनाभरात गोवा ते मुंबई असा ४१३ किलोमीटरचा सागरी प्रवास ११ ते १५ दिवसांत पोहून पार करण्याचा शुभमचा मानस आहे.
शिवछत्रपती पुरस्कार विजेता आंतरराष्ट्रीय ओपन वॉटर जलतरणपटू शुभम वनमाळी ह्याने बोर्डी बीच ते डहाणू बीच हे २३ किलोमीटर अंतर केवळ ५ तास १८ मिनिटांत पोहून पूर्ण केले आहे. बोर्डीवरून सकाळी ७.४५ वाजता निघालेला शुभम डहाणू बीच येथे दुपारी १.०० वाजता पोहचला. यापूर्वी शुभमने जगप्रसिद्ध इंग्लिश खाडी, जिब्राल्टरची समुद्रधुनी, कॅटलीना खाडी, मॅनहटन मॅरेथॉन स्विम, राऊंड ट्रीप एन्जल आयलँड स्विम, परहेन्शियन आयलँड मॅरेथॉन स्विम, राजभवन, वाळकेश्वर ते गेटवे ऑफ इंडिया, धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया आणि गेटवे ऑफ इंडिया ते धरमतर अशा विविध राष्ट्रीय तथा आंतरराष्ट्रीय खाड्या पोहून विक्रम केलेले आहेत. बोर्डी ते डहाणू हा उपक्रम विद्यार्थ्यांमधील अध्ययन अक्षमतेच्या जागरुकतेसाठी करीत असल्याची माहिती त्याच्या नातेवाईकांकडून दिली आहे.
शुभमच्या ह्या विक्रमासाठी त्याचा सत्कार करण्याचा कार्यक्रम डहाणू पोंदा हायस्कूलमध्ये पार पडला. ह्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डहाणूचे तहसीलदार अभिजित देशमुख, डहाणू पोलीस ठाण्याचे प्रभारी नामदेव बंडगर, नवनिर्वाचित डहाणू पंचायत समिती सभापती प्रवीण गवळी, पोंदा शाळेचे विश्वस्त व शिक्षक यांच्यासह शुभमला नेहमीच सहकार्य करणारे शिव शक्ती मित्रमंडळ कासा व त्याचे सहकारी उपस्थित होते.
येत्या महिनाभरात गोवा ते मुंबई असा ४१३ किलोमीटरचा सागरी प्रवास ११ ते १५ दिवसांत पोहून पार करण्याचा शुभमचा मानस आहे. परंतु प्रायोजक, देणगीदार मिळत नसल्याने हा कार्यक्रम थोडा पुढे जाऊ शकतो अशी माहिती त्याच्या कुटुंबियांकडून देण्यात आली.
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…