कांदिवलीत गोळीबार; १ ठार, ३ जखमी

Share

मुंबई : कांदिवलीत शुक्रवारी रात्री सव्वा बाराच्या सुमारास लिंकरोडवर गोळीबाराची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. मोटर सायकल वरून आलेल्या दोघांनी हा गोळीबार केला असून त्यात एक २३ वर्षीय तरुण मृत्युमुखी पडला असून अन्य तिघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना जवळच्या शताब्दी रूग्णालयात दाखल करण्यात आले असून गणेशोत्सव दरम्यान झालेल्या वादातून हा प्रकार घडल्याचे समजते.

कांदिवलीमधील लालजीपाडा परिसरात हा प्रकार घडला. परिमंडळ ११ चे पोलीस उपायुक्त विशाल ठाकूर यांनी या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, मयत तरुण अंकीत इंद्रमणी यादव हा लालजी पाडा येथील जय भारत कांदिवली या एसआरएच्या रिहॅब इमारतीमध्ये राहत होता. शुक्रवारी रात्री सोनू पासवान उर्फ पासी नावाचा आरोपी त्याच्या अन्य साथीदारासोबत मोटर सायकलवरून आला आणि त्याने लिंकरोडवरील कल्पवृक्ष हाईट्स या इमारतीसमोर उभ्या असलेल्या चार तरुणांवर गोळीबार केला.

गोळीबारात अंकित यादव या तरुणाचा मृत्यू झाला. तर, अभिनाश दाभोळकर, मनीष गुप्ता आणि प्रकाश नारायण जखमी झाले आहेत.

जखमींना उपचारासाठी शताब्दी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता धोक्याबाहेर आहे.

यापैकी मयत तरुण अंकीत हा अतिगंभीर असल्याने त्याला अधिक उपचारांसाठी जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तेथे त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी कांदिवली पोलीस सीसीटिव्ही फुटेज पडताळणी करत आहेत.

Recent Posts

Best Bus fare Hike: नॉन-एसी आणि एसी बससाठी आजपासून मोजावे लागणार इतके पैसे

बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीटदर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने आजपासून…

2 minutes ago

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

15 minutes ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

35 minutes ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

55 minutes ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

57 minutes ago

मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

2 hours ago