Categories: मनोरंजन

महाराष्ट्राचा सुपरस्टार आज ठरणार

Share

दीपक परब

गायन क्षेत्रात नाव कमविण्याचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या महाराष्ट्रातील स्पर्धकांना त्यांचे टॅलेंट सिद्ध करता यावे यासाठी स्टार प्रवाह या वाहिनीने त्यांना हक्काचा मंच उपलब्ध करून दिला आहे. या स्पर्धकांच्या स्वप्नांना मुर्त रूप देण्यासाठी एक प्रवास सुरू झाला व तो म्हणजे ‘मी होणार सुपरस्टार, आवाज कुणाचा महाराष्ट्राचा’ ही स्पर्धा. वयाचे बंधन नसल्यामुळे अगदी ४ वर्षांच्या चिमुरड्यापासून ७० वर्षांच्या आजोबांपर्यंत प्रत्येकानेच या मंचावर आपली कला सादर केली. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून आलेल्या या गायकांनी स्वतःला सिद्ध केले आणि त्यातील २ सर्वोत्तम गायक आणि २ ग्रुप्सनी आता महाअंतिम फेरी गाठली आहे. अप्रतिम गाणी सादर करून प्रेक्षकांची मन जिंकलेल्या ‘मी होणार सुपरस्टार, आवाज कुणाचा महाराष्ट्राचा’, या कार्यक्रमाचा महाअंतिम सोहळा रविवारी २१ ऑगस्टला रंगणार आहे. मुंबईचा राम पंडित, संगमनेरची वर्षा एखंडे, सांगलीचा लोककलेचा ‘शिलेदार ग्रुप’ आणि गोव्याच्या ‘जिग्यासा ग्रुप’ यांच्यात महाअंतिम लढत रंगणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा आवाज कोण ठरणार याची उत्सुकता वाढली आहे.

महाअंतिम सोहळ्यात स्पर्धकांमधली महाजुगलबंदी पाहायला मिळणारच आहे आणि सोबतीला ‘दगडी चाळ २’ च्या टीमने खास हजेरी लावत या सोहळ्याची शान वाढवली आहे. तेव्हा ‘मी होणार सुपरस्टार, आवाज कुणाचा महाराष्ट्राचा’, या कार्यक्रमाच्या महाअंतिम सोहळ्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘लाल सिंह चड्ढा’ला फटका

कलेक्शनही घसरले, शो रद्द करण्याचीही वेळ!

अभिनेता आमिर खान याचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपाटून आपटला आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर फारच निराशाजनक कामगिरी केली आहे. मंगळवारी सुट्ट्या संपल्यानंतर चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये कमालीची घट झाली. अनेक ठिकाणी या चित्रपटाचे शो रद्द करावे लागल्याचेही वृत्त आहे. ‘लाल सिंह चड्ढा’ चित्रपटाची ही अवस्था पाहून लवकरच हा चित्रपट बॉक्स ऑफिसवरून बाहेर पडेल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

‘चतुर चोर’मध्ये झळकणार ‘पाठक बाई-राणादा’

हॉरर कॉमेडी’ला सध्या प्रेक्षकांचा विशेष प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सोशल मीडियावरही कॉमेडीची जागा अद्याप कोणीही घेतलेली नाही, तसेच काहीसे चित्रपटांच्या बाबतीतही घडताना दिसत आहे. हॉरर कॉमेडी म्हटले की, हॉरर आणि कॉमेडी दोन्हीकडील प्रेक्षकवर्ग एक होऊन या चित्रपटास योग्य तो न्याय देतो. लवकरच एक नवा कोरा ‘हॉरर कॉमेडी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे चित्रीकरण लंडन येथे पार पडले आहे. तगड्या स्टारकास्टचा हा चित्रपट असून, या चित्रपटात अभिनेता हार्दिक जोशी, अभिनेत्री प्रीतम कागणे आणि अक्षया देवधर हे कलाकार झळकणार आहेत. हार्दिक, प्रीतम आणि अक्षयाने या चित्रपटात काय हॉरर कॉमेडी केली आहे, हे पाहणे विशेष रंजक ठरणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर पेक्षकांच्या भेटीला आले आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने महाराष्ट्राची लाडकी जोडी, ‘पाठक बाई-राणादा’ म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर हे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

कोण असणार ‘चतुर चोर’?

या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा किरण कुमावत, स्वाती खोपकर, सुरेखा कागणे, हर्षवर्धन गायकवाड, अमोल कागणे आणि सागर पाठक यांनी पेलली असून, सहनिर्माते म्हणून तबरेज पटेल आणि निनाद भट्टीन यांनी बाजू सांभाळली आहे, तर दिग्दर्शक आणि छायाचित्रकार अमोल गोळे यांनी संपूर्ण चित्रपटाचे दिग्दर्शन आणि छायाचित्रण केले आहे, तर चित्रपटाची कथा लेखक सुमित संघमित्रा आणि सागर पाठक यांनी लिहिली आहे. आता या चित्रपटाची कथा नेमकी काय असेल, हार्दिक, प्रीतम, अक्षयासोबत इतर कोणते कलाकार या सिनेमात झळकणार, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे. लंडनमध्ये चित्रित झालेल्या या हॉरर कॉमेडीतील ‘चतुर चोर’ चतुर चोर नेमका कोण असेल, याची उत्सुकता आता प्रेक्षकांना लागून राहिली आहे.

Recent Posts

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

16 minutes ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

49 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

2 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

2 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

2 hours ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

2 hours ago