Share

प्रा. देवबा पाटील

जामनगर या गावात सुहास व विकास ही दोन मुले राहत होती. ती खूप खूप हुशार व अभ्यासू होती. एकदा ते असेच पावसाळ्याच्या दिवसांत सुट्टीच्या दिवशी सकाळी त्यांच्या शाळेच्या मैदानावर फिरायला गेले. तेथे त्यांना त्यांचे गुरुजीसुद्धा फिरायला आलेले दिसले. त्यांनी गुरुजींजवळ जाऊन त्यांना नमस्कार केला आणि नम्रतेने ते गुरुजींसोबत बोलायला लागले.

“गुरुजी, तुम्ही मागे शिकवलेली श्रावणमास ही कविता म्हणावयास आम्ही आता सुरुवात करणार होतो.” सुहास म्हणाला.
“तुम्हाला येते का ती कविता?”, गुरुजींनी विचारले.
“होय गुरुजी,” दोघांनीही एकसाथ उत्तर दिले.
“सुहास, म्हण पाहू तू प्रथम कडवे.” गुरुजी म्हणाले.
“श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे। क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे।।” सुहासने आपल्या गोड आवाजात तालबद्धतेने पहिले कडवे म्हटले.

“गुरुजी, शिरवे म्हणजे काय हो?” मध्येच विकासने विचारले.
“शिरवे म्हणजे पावसाच्या सरी.” गुरुजी म्हणाले.
“पावसाच्या सरीवर सरी कशा काय पडतात गुरुजी?” विकासने विचारले.

गुरुजी सांगू लागले, “सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ होते. वाफेपासून ढग बनतात. ढगांपासून थंडाव्याने पाऊस पडतो. पावसाचे थेंब खूप उंचावरून एकामागे एक ओळीने खाली येत असल्याने ते थोडेसे लांबतात व त्यांच्या तुटक तुटक सरी बनतात. पाऊस पडताना असणाऱ्या वाऱ्याने या सरी तिरप्या पडतात; परंतु वारा नसल्यास मात्र पाऊस सरळच पडतो.”

सुहास विचारू लागला, “पाण्याच्या वाफेपासून ढग बनतात असे म्हणतात; परंतु ती वाफ तर वर जाताना आपणास कधीच दिसत नाही. याचे कारण काय गुरुजी?”

गुरुजी म्हणाले, “बाष्प म्हणजे वाफ. पाण्याची वाफ होण्याच्या क्रियेला बाष्पीभवन असे म्हणतात. ही बाष्पीभवनाची क्रिया अतिशय मंद असून ती कोणत्याही तापमानात होत असल्यामुळे त्यात निर्माण होणारी वाफ डोळ्यांना दिसू शकत नाही. पण वाफेपासून हे ढग कसे काय बनतात गुरुजी?” सुहासने विचारले.

गुरुजी सांगू लागले, “त्याचं असं आहे. पाण्याची वाफ हवेत साठून राहते. ही बाष्पयुक्त हवा गरम व हलकी झाल्याने वर जाते. जसजसे उंचावर जावे तसतशी हवा थंड होते व त्याचबरोबर हवेतील वाफही थंड होते. ही वाफ धूलिकणांवर बसून पाण्याचे सूक्ष्म कण, जलबिंदू तयार होतात. असे असंख्य कण एकत्र आले म्हणजे त्यापासून ढग बनतो.”

“गुरुजी आपणास ढगांचा गडगडाट इतक्या दुरूनही कसा काय ऐकू येतो?” विकासने विचारले.
गुरुजी म्हणाले, “ढगांमधील असंख्य जलबिंदू हे खूप वेगाने वर खाली, स्वत:भोवती व एकमेकांभोवती फिरतात. त्यामुळे त्यांच्यात व हवेच्या कणांमध्ये घर्षण होऊन काही ढगांवर धन विद्युत प्रभार, तर काही ढगांवर ऋण विद्युत प्रभार निर्माण होतो. हे विद्युत प्रभारित ढग हवेसोबत वाहताना एकमेकांवर आदळतात व त्यांच्या एकमेकांवर आपटल्याने प्रचंड मोठा गडगड असा आवाज निर्माण होतो.”
“मग विजा कशा काय चमकतात गुरुजी?” सुहासने आपली शंका विचारली.

“दोन विरुद्ध विद्युत प्रभारित ढग एकमेकांजवळ आले, तर त्यांच्यातील विभवांतरामुळे म्हणजेच विद्युत प्रभाराच्या फरकामुळे तेथेसुद्धा विद्युत निर्माण होते म्हणजेच त्यांच्या आकर्षण घर्षणाने तेज:पुंज ठिणगी पडून वीज निर्माण होते. तीच वीज तेजस्वी प्रकाशाच्या स्वरूपात बाहेर पडते व आपणास विजेचा प्रकाश चमकताना दिसतो.” गुरुजी म्हणाले.
“गुरुजी आपणास वीज आधी चमकताना दिसते व ढगांचा गडगडाट नंतर का ऐकू येतो?” विकासने प्रश्न केला.
“विजेचा चमचमाट व ढगांचा गडगडाट हे एकाच वेळी घडतात; परंतु प्रकाशाचा वेग ध्वनीच्या वेगापेक्षा खूप जास्त असल्याने आपणास आधी वीज चमकताना दिसते आणि थोड्या उशिराने ढगांचा गडगडाट ऐकू येतो.” गुरुजींनी सांगितले.

“गुरुजी पुष्कळ वेळा गारांचा वर्षाव होण्याचे कारण काय असावे?” सुहासने शंका काढली.
“हे ढग हवेबरोबर वाहवत जातात. त्यातील वाफेचे पाणी होण्यास वातावरणातील पुरेसा थंडावा मिळाला म्हणजे पाऊस पडतो. बरेच वेळा हे ढग अति उंचावर व अति थंड भागात जातात. त्या अति थंड भागात सापडलेले पावसाचे थेंब गोठतात व त्यांच्या गारा बनतात, किंवा बऱ्याच वेळा बर्फ बनते. म्हणून बऱ्याच वेळा गारांचा पाऊस पडतो किंवा हिमवर्षाव होतो.” गुरुजींनी नीट समजावून सांगितले.

एवढ्यात आकाशात पावसाचे काळे ढग जमा होत असलेले त्यांना दिसले. ते बघून गुरुजी म्हणाले, “मुलांनो, आता आकाशात पावसाचे काळे घनगर्द ढग जमू लागले आहेत. त्यामुळे पावसाच्या सरी येण्याची दाट शक्यता आहे. तरी मला वाटते आता आपण घराकडे परतू या.” गुरुजींनी असे म्हटले नि सुहास, विकास व गुरुजी घराकडे चालू लागले.

Recent Posts

India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…

41 minutes ago

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

1 hour ago

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

5 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

6 hours ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

6 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

6 hours ago