अरुण बेतकेकर
”वरून बाळासाहेब ठाकरे यांचा आत्मा सर्व काही पाहतोय. तो तुम्हाला माफ करणार नाही. या मातीत तुम्ही खतम व्हाल. आज तुम्ही घोड्यावर बसले आहात, उद्या लोक तुमची गाढवावरून धिंड काढल्याशिवाय राहणार नाहीत, Mark My Words” हा संजय राऊत यांना झालेला नवा साक्षात्कार. असे साक्षात्कार त्यांना वारंवार होत असतात. सतत बोलून अवलक्षण ओढवून घेणारे संजय राऊत यांचा दांडगा आत्मविश्वास विलक्षण आहे. असे नव नवे प्रयोग करताना आधीच्या वक्तव्याने माजलेल्या काहुरांचे स्वतःस विस्मरण झाल्याचे भासवत लाज, लज्जा सोडून नवे बेताल वक्तव्य ते करत असतात. काही उदाहरणे…
यामागील रहस्य असे, १९९२ साली संजय राऊत सामना दैनिकात पगारी कर्मचारी म्हणून रुजू झाले. १९९८ साली स्वतःस दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरे यांनी राज्यसभेवर खासदारकी देण्याचे मान्य केले होते, असे त्यांचे म्हणणे. प्रत्यक्षात ते दिले गेले प्रितीश नंदी यांना. मनासारखे न घडल्याने राऊत प्रक्षुब्ध झाले. शिवसेना, बाळासाहेब व ठाकरे कुटुंब यांच्याविरोधात त्यांनी सामन्यातूनच आगपाखड सुरू केली होती. नेमक्या त्याच समयी मी लोकाधिकार समितीच्या कामानिमित्त सामना कार्यालयावर पोहोचलो. मला राऊत म्हणाले, “सामना वाचलात का? ठाकऱ्यांची कशी उतरवली आहे. आपणासही ठाऊक आहे. मला खासदारकी बहाल केली होती. पैशाचा व्यवहार करून ती प्रितीश नंदीना दिली. मराठी माणसाचा घात केला. आता पुढे पाहा या बाप-लेकाचे (बाळासाहेब आणि उद्धव) कपडे उतरवून त्यांना रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही. काय करतील सामन्यातून काढून टाकतील. पण अन्य ठिकाणी जाऊन मी हेच जारी राखेन. इतकी वर्षे सामन्यात बसून उखडलेली नाहीत. ठाकरे कुटुंबाचे शेकडो छक्के-पंजे पुराव्यासह माझ्याकडे आहेत.”
राऊतांचे हे शब्द ऐकताच मीही संतापलो होतो. तेथेच त्याला ठोकणार होतो. पण बाळासाहेबांनीच त्यास दिलेल्या खुर्चीचा मान राखत संयम राखला. लागलीच संपूर्ण घटना व माझ्या भावना मातोश्रीवर प्रत्यक्ष भेटून शब्दश: बाळासाहेब व उद्धवजींच्या कानावर घातल्या. अपेक्षित होते त्यावर कारवाई होईल. पण आश्चर्य म्हणजे, राऊतांविरुद्ध सक्त कारवाई करण्याऐवजी त्यांनी मला सबुरीचा सल्ला दिला आणि त्यांना बोलावून आम्ही तडजोडीने हा प्रश्न सोडवू, असे म्हणाले. हे ऐकताच बाळासाहेबांसारख्या कोणाचीही तमा न बाळगणाऱ्या आक्रमक व्यक्तीसही हतबल झालेला मी पहिला. जर ही स्थिती बाळासाहेबांची, तर उद्धवजींकडे यास तोंड देण्याची क्षमता असेल का? ठाकरे कुटुंबाविषयीचे असे कोणते छक्के-पंजे राऊत यांच्या हाती आहेत, हे ठाकरे आणि राऊतच जाणे. पण हा ब्लॅकमेलिंगचा प्रकार आहे हे निश्चित. मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी आणि शिवसैनिक गेले, शिवसेना संपतेय तरी बेहत्तर. पण संजय राऊत टिकले पाहिजेत. उद्धवजींच्या या एका वागण्याने अधोरेखित होते की, ठाकरेंच्यासाठी राऊत ही भिंतीतली सहन न होणारी एक खुंटी आहे.
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…