पणजी : २० रुपयांचा वडापाव खाऊन प्रचार करणा-या नि:स्वार्थी कार्यकर्त्यांकडून १०० रुपयांचे प्रतिज्ञापत्र कशासाठी? पक्षात राहण्यासाठी प्रतिज्ञापत्र नव्हे तर प्रेमाचे बंधन हवे, शिवबंधन हेच प्रेमाचे बंधन आहे, असे शिवसेनेच्या स्वाक्षरी मोहिमेवर बोलताना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितले.
बंडखोर आमदार दीपक केसरकर यांनीही या निर्णयावर हल्लाबोल केला आहे. “पक्षाकडून आता प्रतिज्ञापत्र घेतली जात आहेत. लोकांना प्रेमाने बांधवे लागते. प्रेमाचे बंधन बाळासाहेबांनी आम्हाला बांधले. प्रतिज्ञापत्र देणे म्हणजे कार्यकर्त्यांवर अविश्वास दाखवत आहात,” असे दीपक केसरकर म्हणाले.
आम्ही शिवबंधन आज सुद्धा घालतो. शिवबंधन बाळासाहेब ठाकरे यांची आठवण म्हणून घालतो. आम्ही खरे सैनिक आहोत. आम्ही सर्व कार्यकर्त्याना सांगू इच्छितो, असे अॅफिडेविट केल्यानंतर काहीही होत नाही, असेही केसरकर म्हणाले.
शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्र मागण्याच्या शिवसेनेच्या निर्णयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने टीका केली आहे. आधी शिवबंधन झाले, आता प्रतिज्ञापत्र घेणार आहेत. पण उद्या समजा एखाद्या शिवसैनिकाने पक्षप्रमुखांकडे तुम्ही बाळासाहेबांचे विचार आणि हिंदुत्त्वाचे विचार सोडणार नाहीत असे प्रतिज्ञापत्र मागितले तर त्यांच्याकडून असे प्रतिज्ञापत्र दिलं जाईल का हा महत्त्वाचा प्रश्न आहे, असे मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले.
श्रद्धा कपूर, कंगना रणावत, अनुपम खेर, मधुर भंडारकर, वरुण कोनिडेला यांच्यासह अनेक कलाकारांनी भारतीय जवानांप्रती…
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…