नवी दिल्ली (हिं.स.) : पंजाबच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तान मधून ३ वर्षीय बालक चुकून सीमा पार करून भारतात आला होता. पण सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) ते बालक पुन्हा पाकिस्तानी रेंजर्स कडे सोपवले. बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी आज, शनिवारी याबाबत माहिती दिली.
पंजाबच्या फिरोजपूर सेक्टरमध्ये शुक्रवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास बीएसएफ जवानांना आंतरराष्ट्रीय सीमेवरील कुंपणाजवळ एक मूल रडताना दिसले.
त्यानंतर बीएसएफ फील्ड कमांडरने पाकिस्तानी रेंजर्ससोबत तात्काळ फ्लॅग मीटिंग घेण्याची ऑफर दिली जेणेकरून मुलाला परत सुपूर्द करता येईल. काही वेळातच मुलाला त्याच्या वडिलांच्या उपस्थितीत रेंजर्सच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…