हॉकीपटू वरिंदर सिंग यांचे निधन

Share

जालंधर (वृत्तसंस्था) : ऑलिम्पिक आणि विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण पदक विजेत्या भारतीय हॉकी संघातील खेळाडू वरिंदर सिंग यांचे मंगळवारी जालंधरमध्ये निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. भारतीय हॉकीला आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव लौकिक मिळवून देण्यामध्ये पंजाब आणि हरियाणामधील अनेक खेळाडूंनी आपले योगदान दिले होते. त्यामध्ये वरिंदर सिंग यांचाही समावेश होता.

हॉकी इंडियाने ट्वीट करून त्यांच्या निधनाची माहिती दिली. सिंग यांच्या निधनाबद्दल हॉकी इंडियाने शोक व्यक्त केला आहे. “वरिंदर सिंग यांनी मिळवलेले यश जगभरातील हॉकी समुदाय स्मरणात ठेवेल,” असे हॉकी इंडियाने म्हटले आहे.

वरिंदर यांना २००७ मध्ये ध्यानचंद जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. वरिंदर सिंग हे १९७५ मध्ये क्वालालंपूर येथे झालेल्या पुरुष हॉकी विश्वचषक स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचा भाग होते. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत भारताचे हे पहिले आणि एकमेव सुवर्णपदक होते. तेव्हा भारतीय हॉकी संघाने अंतिम फेरीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा २-१ असा पराभव केला होता.

याशिवाय, वरिंदर सिंग हे १९७२ म्युनिक ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक विजेत्या संघामध्ये त्यांचा समावेश होता. १९७३ मधील अॅमस्टरडॅम विश्वचषकात रौप्यपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचाही ते भाग होते. १९७४ आणि १९७८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही त्यांना रौप्यपदक मिळवण्याची संधी मिळाली होती.

Recent Posts

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

3 minutes ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

23 minutes ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

43 minutes ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

45 minutes ago

मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

1 hour ago

Dagdu Sheth Ganesh Temple: भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडू शेठ हलवाईची सुरक्षा वाढवली

मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…

2 hours ago