पुणे (हिं.स.) महाराष्ट्रात रावण मुख्यमंत्री होऊन बसले असल्यामुळे त्यांना हनुमान चालीसा म्हणणा-यांची भीती वाटत असल्याचा आरोप करत महाराष्ट्रातील जनतेला लुटण्याचे काम ठाकरे- पवार सरकार करत असून महाराष्ट्रातील जनताच आता सरकारची लंका जाळणार असल्याचा घणाघात भाजपचे ज्येष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी केला.
लोहगाव येथील भाजपचे माजी उपसरपंच सुनील खांदवे-मास्तर यांनी वारकऱ्यांसाठी रेनकोट, तंबूचे वाटप तसेच विविध कोर्सचे प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. किरीट सोमय्या बोलताना म्हणाले, हनुमान चालीसा म्हणणारा जेलमध्ये जातो आणि दाऊदचा हस्तक मात्र मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून बसतो.
मुख्यमंत्री पदासाठी हिंदुत्व गहाण ठेवले असून सचिन वाजे हा माफीचा साक्षीदार झाल्यामुळे आता अनिल परब यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांचेदेखील नाव वसुली प्रकरणात येऊ शकते. त्यामुळे त्यांना भिती वाटत आहे.
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…