महापालिका निवडणुकीवर दुसऱ्यांदा कोरोनाचे सावट

Share

नवी मुंबई (प्रतिनिधी) : नवी मुंबईच्या सहाव्या सार्वत्रिक निवडणुकीचे पडघम दुसऱ्यांदा दोन वर्षांच्या अवधीनंतर कुठे वाजू लागले. यावर प्रस्थापित तसेच विरोधी पक्षातील इच्छुक उमेदवार निवडणूक लढविण्याची तयारी करत असतानाच पुन्हा एकदा कोरोना नावाच्या महामारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. सुमारे दोन वर्षांपूर्वी निवडणूक संदर्भात कार्यक्रम चालू असतानाचा त्यासारखाच प्रकार कोरोनामुळे पुन्हा सुरू झाल्याने नियोजित निवडणूक प्रक्रियेवर कोरोनाचे सावट प्रश्नचिन्ह निर्माण करू लागले आहे.

२०२० या वर्षीच्या सुरुवातीपासून सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीच्या कार्यक्रमाला जोर धरू लागला होता. त्यावेळी मतदार यादीचे सर्व काम पूर्णत्वास जाऊन प्रसिद्ध केल्या गेल्या. प्रभाग रचनादेखील जाहीर झाली. मतदानाचा कार्यक्रम जाहीर होईल अशी अपेक्षा केली जात असतानाच कोरोनाच्या पहिल्या लाटेस प्रारंभ झाला. त्यानंतर कोरोना महामारीचा धसका निवडणूक आयोगाने घेत निवडणूक प्रक्रिया अनिश्चित काळासाठी थांबवण्याचे आदेश दिले गेले. मागील दोन वर्षांत निवडणुकीसंदर्भात अनेक निर्णय झाले.

परंतु आलेल्या दुसऱ्या व तिसऱ्या लाटेने निवडणुकी घेण्याविषयीचे निवडणूक आयोगाचे प्रयत्न अपयशी ठरले गेले. २०२२च्या सुरुवातीपासून कोरोना महामारीचे प्रमाण नियत्रंणात येऊ लागले. कोरोना नियत्रंणात येताच राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या हालचालीही सुरू झाल्या; परंतु देशात, राज्याच्या इतर भागात पुन्हा एकदा कोरोनाने उचल घेतल्याने त्याचा प्रभाव दररोज आकडेवारीतून पुन्हा दिसू लागला.

मागील आठवड्यात मंगळवारी निवडणूकीच्या दृष्टीने नव्याने प्रभाग रचना जाहीर झाली आहे. आता त्यावर आलेल्या आक्षेपावर कार्यवाही केली जाईल. त्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल. बाकी कोरोनाचा संसर्ग वाढत असताना निवडणूक आयोगाकडून ज्या सूचना येतील. त्यानुसार कार्यवाही केली जाईल. – अमरीश पटनिगिरे, उपायुक्त, निवडणूक विभाग

मागील काही दिवसांपासून नवी मुंबई शहरात बरे होऊन जाणाऱ्या रुग्णांपेक्षा दुप्पट रुग्ण संसर्गित होत आहेत. शुक्रवारी ३० रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर ६३ रुग्ण संसर्गित झाले. यावरून कोरोनाचा प्रभाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. यापूर्वी बोटावर मोजण्याइतपत रुग्णसंख्या होती. समाधानाची बाब म्हणजे मृत्यूसंख्या २०४९ या जुन्याच आकड्यावर स्थिर आहे.

२०२० मध्ये निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आणि प्रभाग रचना जाहीर झाली आणि कोरोनाची पहिली लाट सुरू झाली. त्यानंतर निवडणूक प्रक्रिया थांबविली गेली होती. आताही २०२२ मध्ये दुसऱ्यांदा प्रभाग रचना जाहीर झाली व कोरोनाने डोके वर काढले. हा योगायोग म्हणावा लागेल.

Tags: coronaNMCC

Recent Posts

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

15 minutes ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

35 minutes ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

49 minutes ago

High alert in Mumbai: मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता; हायअलर्ट जारी

मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…

1 hour ago

India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…

2 hours ago

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

2 hours ago