पराभवाचेही सोने केले; पंकजा मुंडे यांचे गोपीनाथ गडावर वक्तव्य

Share

बीड (वृत्तसंस्था) : माझी चिंता करू नका. मला सगळे विचारतात तुमचे भविष्य काय आहे. उद्या काय होणार आहे? तुम्हाला काय मिळणार आहे? याची मला खरंच चिंता नाही. दिलेल्या संधीचे सोने करणे हे गोपीनाथ मुंडेंचे संस्कार आहेत. माझ्या पराभवाचे देखील मला सोने करता आले, हा पराभव मला दिल्लीपर्यंत घेऊन गेला, असे प्रतिपादन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त शुक्रवारी बीड येथील गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची प्रमुख उपस्थिती होती. कोरोना काळानंतर दोन वर्षांनंतर गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी शुक्रवारी मोठ्या प्रमाणात मुंडे समर्थकांनी गोपीनाथ गडावर उपस्थिती दर्शवली.

आपल्याला काय मिळेल आणि काय नाही मिळणार याची चिंता करण्याची आवश्यकता नाही. आपल्याकडे जे आहे ते कसे आपल्याला बांधून ठेवता येईल, हे आपल्याला करायचे आहे, असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.दरम्यान सत्तेसाठी नाही पण गोपीनाथ मुंडे हे सत्यासाठी लढले, वंचितांच्या हितासाठी भल्या-भल्यांना भिडले. निर्भीड होती वाणी आणि करारी होता बाणा. हिमालयाला टक्कर दिली पण वाकला नाही त्याचा कणा, अशा गोपीनाथ मुंडेंना आपण आपला नेता मानतो. असेही यावेळी पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवले.

दरम्यान यावेळी पंकजा मुंडे यांनी संकटांनो मी तुम्हाला शरण यावं एवढी तुमची औकात नाही. जीवनाच्या या रणांगणात पाय ठेवून मी ठाम उभी राहीन, एवढी ताकद माझ्या लोकांमध्ये आहे. सोसेल तुमचे वर्मी घाव तरी मी घायाळ होणार नाही, छाताडावर तुमच्या पाय देऊन समाजातील वंचितांसाठी लढण्यासाठी मी उभी राहीन, तुम्हाला कसे ते कळणार देखील नाही, असे देखील पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवले.

Recent Posts

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

7 minutes ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

27 minutes ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

46 minutes ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

49 minutes ago

मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

1 hour ago

Dagdu Sheth Ganesh Temple: भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडू शेठ हलवाईची सुरक्षा वाढवली

मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…

2 hours ago