सिडकोतर्फे ९०८ कांदळवन क्षेत्र वन विभागाकडे हस्तांतरित

Share

नवी मुंबई (प्रतिनिधी) : सिडकोतर्फे एकूण सुमारे ९०८ हेक्टर कांदनवळाखालील जमिनीच्या हस्तांतरणाबाबतची प्रक्रिया मंगळवारी पूर्ण करण्यात आलेली आहे. यापैकी २७९ हेक्टर जमीन सिडकोच्या ताब्यात असून उर्वरित ६२९ हेक्टरकरिता ना-हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे. सिडकोस कांदळवनाखालील जमीन वन विभागास हस्तांतरित करणेबाबत पर्यावरण विभागाकडून निर्देश देण्यात आलेले होते. “पर्यावरण रक्षण आणि संवर्धन उपक्रमांस सिडकोने नेहमीच सहकार्य केले आहे. याचाच एक भाग म्हणून नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कांदळवन क्षेत्राचे वन विभागास हस्तांतरण करण्यात आले आहे.”

या प्रसंगी डॉ. संजय मुखर्जी, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको, विरेंद्र तिवारी, अति. प्रधान मुख्य वनसंरक्षक, कांदळवन कक्ष, महाराष्ट्र, डॉ. कैलास शिंदे, सहव्यवस्थापकीय संचालक, सिडको, रवी कुमार, मुख्य नियोजनकार, सिडको आणि आदर्श रेड्डी, उपवनसंरक्षक, कांदळवन कक्ष हे प्रामुख्याने उपस्थित होते.

सिडको महामंडळाच्या ताब्यात असलेली ठाणे तालुक्यातील सुमारे १४५८ हेक्टर कांदळवनाखालील क्षेत्र यापूर्वीच वनविभागाकडे हस्तांतरित करण्यात आलेली आहे. पर्यावरण मंत्र्यांनी दिलेल्या निर्देशांनुसार, एकूण सुमारे ९०८ हेक्टर कांदनवळाखालील जमीनीचे हस्तांतरणाबाबतची प्रक्रीया सिडकोतर्फे पूर्ण करण्यात आली आहे. यापैकी २७९ हेक्टर जमीन सिडकोच्या ताब्यात असून उर्वरित सिडकोच्या ताब्यात नसलेल्या जमीनीकरिता ना-हरकत प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले आहे. आतापर्यंत सिडकोने पनवेल आणि उरण तालुक्यांतील कांदळवनाखालील जमिनीचे हस्तातंरण पूर्ण केले असून नवी मुंबईतील संपूर्ण कांदळवन क्षेत्राचे हस्तातंरण करण्याची प्रक्रिया सिडकोने पूर्ण केली आहे.

Recent Posts

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

22 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

1 hour ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

1 hour ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

1 hour ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

2 hours ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

2 hours ago