Categories: क्रीडा

लखनऊ-बंगळूरुमध्ये आरपारची टक्कर

Share

कोलकाता (वृत्तसंस्था) : बुधवारी लखनऊ सुपर जायंट्स आणि प्लेऑफमध्ये प्रवेश केलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु यांच्यात एलिमिनेटर सामना होणार आहे. या दोन्ही संघांनी अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर लीग साखळीतील टप्पा पूर्ण केला. एलिमिनेटर खेळणाऱ्या दोन संघांपैकी एकाचा प्रवास या सामन्यातील पराभवाने संपणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी कोणत्याही परिस्थितीत विजय आवश्यक असलेल्या या सामन्यात आरपारची टक्कर अनुभवण्यास मिळू शकते.

या हंगामात दोन्ही संघ दुसऱ्यांदा आमने-सामने येतील. याआधी साखळी टप्प्यात दोन्ही संघांत सामना पाहायला मिळाला होता, ज्यामध्ये बंगळूरुने लखनऊचा दणदणीत पराभव केला होता. पण आता प्लेऑफच्या मोठ्या टप्प्यावर स्पर्धेचे दडपण वेगळेच असणार आहे, दोन्ही संघ आपला शेवटचा सामना जिंकून प्लेऑफमध्ये पोहोचले आहेत.

आयपीएल २०२२ ची सुरुवात लखनऊ सुपर जायंट्ससाठी खास नव्हती. संघाला पहिल्याच सामन्यात गुजरातकडून पराभव स्वीकारावा लागला होता. पण या पराभवानंतर केएल राहुलच्या नेतृत्वाखालील संघाने वेग पकडला आणि त्यानंतर मागे वळून पाहिले नाही. गेल्या काही सामन्यांमध्ये लखनऊला टेबल टॉपर बनण्याची विशेष संधी होती. मात्र, शेवटच्या ३ सामन्यांपैकी २ गमावून त्याने ही संधी गमावली.

कोलकाताविरुद्ध लखनऊने साखळी टप्प्यातील शेवटचा सामना खेळला. या सामन्यात केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी आयपीएलच्या इतिहासातील सर्वोच्च सलामी भागीदारी करत २१० धावा केल्या होत्या. पण हे लक्ष्य वाचवण्यात संघाच्या गोलंदाजांची तारांबळ उडाली, अखेरीस एविन लुईसच्या अप्रतिम झेलने लखनऊच्या पारड्यात हा सामना गेला. अशा स्थितीत एलिमिनेटरमध्ये संघाच्या गोलंदाजांवर विजयाची जबाबदारी असणार आहे. दुसरीकडे, आयपीएल सुरू होण्यापूर्वी चॅलेंजर्सचा टॉप-४ चा संघ म्हणून कोणीही विचार केला नव्हता. पण संघातील अनकॅप्ड खेळाडूंनी ज्या प्रकारे आपला खेळ उंचावत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे, तो पूर्णपणे वाखाणण्याजोगा आहे. यामध्ये रजत पाटीदार आणि शाहबाज अहमद हे सर्वात मोठे सकारात्मक मुद्दे समोर आले आहेत. त्यांच्यासोबतच अनुभवी दिनेश कार्तिकनेही आपल्या धमाकेदार कामगिरीने सर्वांना चकित केले आहे.

शेवटच्या सामन्यापूर्वी या संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीची बॅट शांत होती. बंगळूरुसाठी सर्वात मोठा दिलासा म्हणजे शेवटच्या साखळी सामन्यात विराटने शानदार ७३ धावा केल्या. शिवाय या सामन्यात फाफ

डु प्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनीही संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. आता एलिमिनेटर सामन्यात बंगळूरुच्या विजयासाठी या तिन्ही खेळाडूंचे चालणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासोबतच या मोसमातील आतापर्यंतच्या दोन्ही संघांच्या कामगिरीनुसार केएल राहुलचे पारडे जड असल्याचे दिसते. कारण, या मोसमात लखनऊचा संघ दुसऱ्या स्थानी गेलेल्या राजस्थानपेक्षा अधिक संतुलित दिसत आहे.

ठिकाण : ईडन गार्डन्स, कोलकाता वेळ : रात्री ७.३० वाजता

Recent Posts

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

24 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

1 hour ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

1 hour ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

1 hour ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

2 hours ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

2 hours ago