अणसुरे ठरली देशातील एकमेव ग्रामपंचायत

Share

पुणे येथे आज ग्रामपंचायतीचा होणार गौरव

राजापूर (वार्ताहर) : सनाच्या माझी वसुंधरा योजनेअंतर्गत जैवविविधतेवर आधारित अणसुरे ग्रामपंचायतीने तयार केलेल्या वेबसाईटचा आज, रविवारी २२ मे रोजी पुणे येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ आणि ग्रामपंचायतींचा सन्मान होणार आहे.

अणसुरे ग्रामपंचायतीने शासनाने जाहीर केलेल्या ‘माझी वसुंधरा’ या योजनेमध्ये अतुलनीय कामगिरी केली आहे. संपूर्ण भारतात जैवविविधतेवर आधारित वेबसाईट बनविणारी अणसुरे ही एकमेव ग्रामपंचायत ठरली आहे. आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवसानिमित्त महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळामार्फत आयोजित कार्यक्रमात या वेबसाइटचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असून याच कार्यक्रमात ग्रामपंचायतीला सन्मानित केले जाणार आहे.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विभागीय आयुक्त पुणे सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिपचे सीईओ आयुष प्रसाद, महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ.शेषराव पाटील, प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रवीण श्रीवास्तव आदी उपस्थित राहणार आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अॅण्ड रिसर्च सभागृह पुणे येथे या शानदार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

राज्यातील आठ ग्रामपंचायतीमध्ये अणसुरे ग्रामपंचायतीची या सन्मानासाठी निवड झाली आहे. मात्र या सर्व ग्रामपंचायतींमध्ये अणसुरे ही एकमेव ग्रामपंचायत आहे, जिने जैवविविधतेवर आधारित वेबसाइट बनविली आहे. या आठ ग्रामपंचायतीचे विशेष सर्वेक्षण राज्यस्तरावरिल कमिटीमार्फत येत्या चार दिवसांत होणार असून प्रथम विजेत्या ग्रामपंचायतीला तब्बल एक कोटींचा पुरस्कार मिळणार आहे. या ग्रामपंचायतीने बनविलेल्या वेबसाइटचा शुभारंभ आ. राजन साळवी यांनी डिसेंबर २०२१ मध्ये अणसुरे ग्रामपंचायत येथे केला होता.

त्यावेळी ग्रामविकास अधिकारी राजेंद्रप्रसाद राऊत आणि जैवविविधता अभ्यासक तुळपुले यांनी या वेबसाइटच्या दिलेल्या प्रेझेंटेशनने प्रभावित झालेल्यासाळवी यांनी त्यांचे विशेष कौतुक करुन शुभेच्छा दिल्या होत्या. शासनाची एखादी योजना जाहीर होताच इतके प्रभावी काम करणे सोपे नव्हते मात्र अणसुरे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी राजेंद्रप्रसाद राऊत यांनी हे आव्हान यशस्वीरित्या पेलले आणि सरपंच, सर्व सदस्य, ग्रामस्थ यांना या प्रवाहात आणून हा बहुमान प्राप्त केला आहे.

पुणे येथे होत असलेल्या या कार्यक्रमाला सरपंच रामचंद्र कणेरी, ग्रामविकास अधिकारी राजेंद्रप्रसाद राऊत आणि जैवविविधता अभ्यासक तुळपुले उपस्थित राहणार आहेत. त्यांना सर्व स्तरातून शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Recent Posts

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

4 minutes ago

High alert in Mumbai: मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता; हायअलर्ट जारी

मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…

19 minutes ago

India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…

1 hour ago

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

2 hours ago

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

6 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

6 hours ago