रत्नागिरी : दापोली पोलीस ठाण्याला काही दिवसांपूर्वी लागलेल्या आगीच्या घटनेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांची भूमिका संशयस्पद असल्याचा गंभीर आरोप भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी केला आहे. रत्नागिरीच्या कारागृहात असलेल्या प्रदीप गर्ग या कैद्याचा एसपींशी कोणता संबंध आहे, असा सूचक सवाल निलेश राणे यांनीउपस्थित केला आहे.
गेल्या १४ मे रोजी सकाळी दापोली पोलीस ठाण्याच्या इमारतीला आग लागली. त्यामध्ये अनेक महत्त्वाची कागदपत्रे जळून गेली. गेल्या दीड वर्षापासून दापोली पोलीस ठाणे महाराष्ट्राच्या राजकारणात मध्यवर्ती आहे. याच तालुक्यातील आसूद येथे पालकमंत्री अनिल परब यांनी अनधिकृत रिसॉर्ट बांधल्याचे आणि त्या अनुषंगाने त्याच्यावर गुन्हा दखल करण्याची मागणी भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. या संपूर्ण प्रकरणाच्या तपासाची कागदपत्रे या दापोली पोलीस ठाण्यात असताना आणि हे प्रकरण शेवटच्या टप्प्यावर असताना तेथील कागदपत्रे १४ मे रोजी लागलेल्या आगीत जाळून गेल्याची भीती स्वतः किरीट सोमय्या यांनी व्यक्त केली आहे.
याचवेळी माजी खासदार निलेश राणे यांनी डॉ. गर्ग यांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. एसपींचे सरकारी निवासस्थान दापोलीपासून ४ तासांच्या अंतरावर असताना एसपी आग लागल्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात घटनास्थळी कसे पोहोचले, पोलीस ठाण्याला आग लागणार याची माहिती त्यांना होती का, असा थेट सवाल श्री. राणे यांनी व्यक्त केला आहे.
पालकमंत्री अनिल परब यांच्या रिसॉर्ट प्रकरणी गेल्या दोन महिन्यांपासून एसपींच्या दापोली फेऱ्या का वाढल्या, दापोलीत सरकारी निवासस्थानाऐवजी खासगी रिसॉर्टमध्ये राहणाऱ्या एसपींची बिले, त्यांचा खर्च कोण भागवते, त्यांच्या रत्नागिरीतील कार्यालयच्या नूतनीकरणासाठी मटेरियल कोणी दिले, त्याची बिले कोण भरते? पोलीस वेल्फेअर फंडाचा पैसा गर्ग कुठे वळवताहेत, असे सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.
रत्नागिरीच्या कारागृहात प्रदीप गर्ग नावाचा फसवणुकीच्या प्रकरणात दाखल झालेल्या कैद्याला गर्ग या आडनावामुळे विशेष वागणूक मिळत आहे. त्याचा एसपी श्री. गर्ग यांच्याशी काय संबंध आहे, हेसुद्धा आपण लवकरच उघड करणार असल्याचे श्री. राणे यांनी सांगितले.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…