प्रा. प्रवीण पांडे
यंत्रमानवांच्या प्रदेशात आताचे युग हे विज्ञान व तंत्रज्ञानाचे युग आहे. तसेच या प्रांतात रोजच काहीतरी नवीन शोध लागत आहेत. त्यापैकीच यंत्रमानव ही विज्ञान व तंत्रज्ञानाची एक फार मोठी किमया आणि उपलब्धी आहे. आणि याबद्दल शिक्षण मिळण्याकरिता रोबोटिक्स इंजिनीअरिंग ही शैक्षणिक शाखा उपलब्ध आहे.
रोबोट म्हणजे काय? तो कसे काम करू शकतो? त्यामध्ये वापरले जाणारे भाग कोणते असतात? त्यावर नियंत्रण कसे ठेवले जाते? असे अनेक प्रश्न आपल्या मनात उत्पन्न होतात. अतिशय सोप्या शब्दांत सांगायचे तर रोबोट म्हणजे संगणक (कॉम्प्युटर), यांत्रिक भाग (Mechanical Parts), कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) व संगणक आज्ञावली (Computer Programs) या मुख्य घटकांची, जुळवणी करून तयार झालेले यंत्र, जे दिलेल्या सूचनेनुसार त्याच्या जवळ उपलब्ध असणाऱ्या माहितीच्या आधारे अनेक कामे पार पाडू शकते.
(या लेखात आपण विज्ञानिक भाषेमधील किंवा तांत्रिक व्याख्यांपेक्षा विषय समजून घेण्यावर जास्त प्रकाश टाकूयात). तसे पाहता रोबोट हे अनेक प्रकारचे आहेत, असतात. त्यांच्या कार्य क्षमतेप्रमाणे तसेच
कार्यक्षेत्रनुसार त्यांची विभागणी केली जाते. आता यंत्र मानवाचा वापर करायचा, त्यावर नियंत्रण ठेवायचे, तर त्याकरिता काही नियम ठरविण्यात आलेले आहेत.
पहिला नियम : रोबोटने कोणत्याही मनुष्य प्राण्यास इजा करता कामा नये.
दुसरा नियम : मानवाने दिलेल्या आज्ञांचे पालन रोबोटने केले पाहिजे; परंतु अशी आज्ञापालन करीत असताना पहिल्या नियमाचे उल्लंघन होता कामा नये.
तिसरा नियम : रोबोटने स्वतःच्या अस्तित्वाचे रक्षण करावे; परंतु हे करीत असताना पहिल्या व दुसऱ्या नियमाचे उल्लंघन होणार नाही.
रोबोटसची संरचना : रोबोट म्हणजेच यंत्रमानव हे अतिशय क्लिष्ट असे यंत्र आहे. त्यामुळे त्याची संरचना देखील क्लिष्ट असते. पण आपण ती सोप्या व सहज पद्धतीने समजून घेऊया.
यामध्ये असणाऱ्या घटकांमधील काही अति महत्त्वाचे घटक खालीलप्रमाणे आहेत.
हे तर फार महत्वाचे घटक आहेत. कारण मानवास रोबोटस सोबत संपर्क साधायचा असेल, त्याला काही आज्ञा द्यावयाची असेल तर ह्या दोघांमध्ये काहीतरी दुवा वापरावाच लागेल. तसेच ह्या अद्भुत यंत्राने आपल्या सूचनेबरहुकुम काम सुचारू पणे करायचे असेल तर त्याकरिता त्याला विशिष्ठ प्रकारची आज्ञावली असावी लागेल, जी ते यंत्र समजून घेवून त्या प्रमाणे कार्य करू शकेल.
तर मित्रांनो ही आहे रोबोटस बद्दल प्राथमिक ओळख.
आज मोठ मोठ्या कारखान्यांमधून अनेक कामे करण्याकरिता रोबोटस चा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. तर चला व्हा तय्यार ह्या नव्या युगाचे आव्हान स्वीकारायला.
भेटू या ह्या लेख मालिकेतील पुढील लेखात.
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरसह भारतातील काही राज्यांमध्ये पाकिस्तानकडून हल्ला करण्यात आला. या हल्ल्याला भारत्या एअर सिस्टीमने…
नवी दिल्ली: ऑपरेशन सिंदूरमध्ये ९ दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर आणि ९०हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर…
भारताने पाकिस्तानची ३ विमाने पाडली, जम्मूत दोन जेएफ १७ आणि राजस्थानमध्ये एक एफ १६ पाडले…
धरमशाला: इंडियन प्रीमियर लीग २०२५च्या ५८व्या सामन्यात पंजाब किंग्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध धरमशालाच्या हिमाचल प्रदेश…
जम्मू : ‘सुधर जाओ पाकिस्तान’ आता असच म्हणावं लागेल. भारत-पाकिस्तानमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. पहलगाम…
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारत सरकारचा निर्णायक निर्णय नवी दिल्ली : ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पहलगाम येथील अलीकडील…