नवीन पनवेल (वार्ताहर) : मार्च-एप्रिल महिन्यापासून नवीन पनवेल परिसरात विजेचा लपंडाव मोठ्या प्रमाणावर पाहावयास मिळत आहे. कित्येक तास वीज गायब होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यानिमित्ताने महावितरणचा भोंगळ कारभार समोर आला आहे. त्यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.
उन्हाळ्यास सुरुवात झालेली असून तापमानात वाढ झाल्याने अंगाची काहिली होत आहे. त्यातच दर दिवशी नवीन पनवेल परिसरातील वीज पुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. रात्रीच्या वेळेस देखील वीज पुरवठा खंडित होत असल्याने मच्छरांचा उपद्रव जाणवू लागला आहे. सकाळ, दुपार, संध्याकाळ व रात्री या चारही वेळेला कधीही वीज गायब होत असल्याने नक्की वीज कोणत्या वेळेला असते असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. वारंवार वीज गायब होत असली तरी देखील वीज बिल कमी होण्याचे नाव घेत नाही. नवीन पनवेलमध्ये महावितरणचे लाखो वीज ग्राहक आहेत.
मात्र दररोज त्यांना विजेचा लपंडाव सहन करावा लागत आहे. सततच्या विजेच्या जाण्यामुळे विद्युत उपकरणे खराब होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. दिवसा वीज जातेच शिवाय रात्री देखील वीज गायब होत असल्याने व्यवस्थित झोप देखील मिळत नसल्याची व्यथा नागरिक मांडत आहेत. विजेची समस्या त्वरित सोडवावी, अशी मागणी नागरिक करत आहेत.
श्रद्धा कपूर, कंगना रणावत, अनुपम खेर, मधुर भंडारकर, वरुण कोनिडेला यांच्यासह अनेक कलाकारांनी भारतीय जवानांप्रती…
मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…
बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…
सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…