Categories: कोलाज

अंध सावल्या…

Share

डॉ. पल्लवी परुळेकर – बनसोडे

‘त्यांच्या भकास डोळ्यांत
नव्हत्या बाहुल्या दृष्टीच्या
मी डोळस तरीही
अंध जाहल्या सावल्या सृष्टीच्या…’

लग्नानंतर जवळजवळ तब्बल दहा-बारा वर्षांनी पुन्हा एम.ए.ला प्रवेश… माहेरचं फुलपाखरी जीवन संपलं आणि शहाणपणाचं सासर जबाबदारीचं अस्तित्व समजावून गेलं… मनातल्या तळघरात आपण काहीच करत नाही, ही खंत ढोपरात डोकं घालून बसली होती… वर मान करून राहून गेलेलं सारं पुन्हा करण्यासाठी आतला आवाज धडपडत होता. अनुभवांचं गाठोडं सोबत होतंच… आयुष्याचे मार्मिक ओरखडेही सोबतीला होतेच. शिक्षण हेच एक माध्यम आहे जे स्वतःला सिद्ध करण्यासाठी पूरक आहे. उशिरा का होईना, पण आयुष्याचे अनुभव मला घडवत होते. कित्येक प्रसंग जगायचं कसं, जगणं कसं असतं याचे दाखले देत मला घडवत होतं आणि मला घडायचं होतं, शिकायचं होतं… ‘स्व’ जाणीव जिवंत ठेवायची होती.

असेच एकदा संसाराच्या रामरगाड्यातून उसंत काढत रोजच्याच बेताच्या मानसिकतेत निघाले. घुसमटलेला प्रवास श्वास रोखत रोखतच पावलांसोबत चालत होता. रिक्षा, ट्रेन, बस मग पायी निघत एकदाचा एम. ए. मराठी भाग दोनचा वर्ग आला.

प्रयत्न करूनही उशिरा पोहोचल्याची खंत सोबत होतीच; परंतु… ‘वाट तुडवताना’ उत्तम कांबळे यांचं पुस्तक शिकायला मिळणार याची उत्सुकताही होतीच… वर्गावर पोहोचले. वृषाली एकटीच वर्गात. थोडंसं दार लोटून मी आत शिरले. सरांचं शिकवणं सलग चालू होतं. मी आल्याचं त्यांना जाणवलं नाही. ते शिकवत राहिले. मीही चटकन वही काढून पानावर संदर्भ मांडत गेले. पुस्तक समोर ठेवून बोटं फिरवत वाचावं तसं ते बोलत होते. जणू काही आपण पुस्तकच वाचतोय. अधूनमधून ‘काही प्रश्न आहेत का?’ ते विचारत होते. पुन्हा सलग आशय चालू. आत्मकथनाच्या नायकाने आत्मकेंद्री होऊन निवडलेली वाट कोणकोणत्या वळणाने गेली, त्याचं आत्मभान, सामाजिक दृष्टिकोन, वाचनाच्या भुकेने नायकाचा ‘स्व’ कसा विकसित होत गेला, याचं विश्लेषण करत सर बोलत होते. कुठेही न थांबता, न विसरता ते सलग विषय मांडत होते. काही वेळानंतर मी लिखाणापेक्षा श्रवण भूमिका स्वीकारली. एरव्ही पुस्तक वाचताना किंवा पुस्तक वाचून झाल्यावरही काही गोष्टी अस्पष्ट होत जातात; परंतु सरांचं मात्र तसं होत नव्हतं. ते सलग एकाच गतीने पान उलगडत होते. अजून एक अपंगत्व मी जवळून पाहत होते उघड्या डोळ्यांनी…

त्याचक्षणी सकाळचा तो प्रसंग आठवला. नायगाव स्टेशनला मी लेडीज डब्या ठिकाणी चर्चगेट गाडीसाठी उभी होते. त्यावेळी माझ्या शेजारी एक अंध व्यक्ती उभी होती. थोड्याफार फरकाने त्यावेळी त्या अंध व्यक्तीला त्यांच्याच ओळखीच्या बाईंनी प्रश्न केला की, “तुम्हाला कसं कळतं की डबा इथे येणार?” त्यावर ते चटकन म्हणाले, ‘हे वर मशीन जे टिक्-टिक् करतं. त्या आवाजाच्या सावल्या आम्हाला सावध करतात. तो सिग्नल असतो आमच्या अंधत्वाचा…’ चेहऱ्यावर पुसटसंही दुःख नव्हतं त्या आंधळेपणाचं, उलट मिश्कीलपणाचा जणू बुरखा पांघरलेला… एरव्ही कधीही नजरेस न आलेली, ऐकलेली ती टिक् टिक् मला अस्वस्थ करून गेली. त्यानंतर आज पुन्हा साबळेसरांचं नुसतं पांढरं फिरणारं बुब्बुळ, पुसटसाही काळा ठिपका नसलेलं या जाग्या डोळ्यांना अंध करत होतं. प्रसन्न चेहरा, शिकविण्याची कसब, आत्मविश्वास डोळसांना लाजवणारा. डोळे असूनही ते आयलायनर, नाहीतर काजळाने रंगवून सौंदर्य मिरविणारे आम्ही आणि गॉगल्सच्या नावाखाली वासनेच्या नजरा चुकवणारा चेहरा या पलीकडे काहीच समोर येत नव्हतं.

याच विचारात आणखी एक अंध आठवण पाय पसरून बसली. परवा लेक्चरसाठी आम्ही तिघी बाईंची वाट पाहत बाहेर थांबलो होतो. तेवढ्यात एक बाई दुसरीचा हात धरून पायरी चढली आणि जवळच असलेल्या आमच्या प्यूनकाकांनी विचारलं, “लॅपटॉप लागेल का? काढून ठेवू ?”

त्यावर त्या म्हणाल्या, “हो काका, प्लीज.” मला कळेनाच या अंध बाई आणि लॅपटॉप… विषय तिथेच सुटला होता… पण आज तेही अंधत्व मला नजरेआड करता येत नव्हतं. लाज वाटत होती स्वतःची. डोळ्यांत वेदनेचं जडत्व साचलं. पापण्यातल्या त्या अश्रूंत सारं अंधुक भासलं. तेव्हा खरंतर त्यांच्या अंधत्वाची तीव्रता माझ्या डोळ्यांनी सोसली…

Recent Posts

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

4 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

47 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

50 minutes ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

1 hour ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

1 hour ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

2 hours ago