कणकवली (प्रतिनिधी) : कणकवली आचरा रोडवर कलमठ मच्छीमार्केटजवळ स्वामी रामेश्वर या खासगी बसला अपगात झाला. पोलीस स्टेशनपासून सुरू होणाऱ्या उतारावर ब्रेक न लागल्यामुळे ही बस रस्त्याच्या कडेला असलेल्या वीजेच्या खांबावर आदळली. यामुळे वीजेचा खांब मोडला. वीजेच्या ताराही तुटल्या, तर एका पानटपरीचेही नुकसान झाले. तथापि, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र बसचे बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले आहे.
रविवारी सकाळी पाऊस सुरू झाला. त्यामुळे रस्ता ओला झाला होता. त्याचवेळी कणकवली पोलीस स्टेशनपासून सुरू होणाऱ्या उतारावर मुंबई ते आचरा जाणारी खासगी बस क्र. एम.एच.०९ एफ.एल.९०९९ च्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यामुळे हा अपघात झाला. त्यातच रविवार असल्याने कलमठ मासळी बाजारात गाड्या व माणसांची प्रचंड गर्दी होती. त्यामुळे बस मच्छीमार्केटच्या आधी थांबणे गरजेचे होते, अन्यथा अनर्थ झाला असता. यावेळी रस्त्याच्या कडेला गाडी घेत असताना विजेच्या खांबावर बस चढली आणि अपघात झाला.
दरम्यान, अपघात झाल्याचे समजताच दळवी कॉलनीतील युवकांनी घटनास्थळी धाव घेत प्रवाशांना बसमधून बाहेर काढले. तसेच रस्त्यावरील गर्दी कमी करत रस्ताही मोकळा केला.
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…