सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात मान्सूनपूर्व आढावा बैठक

Share

सिंधुदुर्ग (हिं.स.) : आपत्ती कधी, केव्हा, कशी येईल हे सांगता येत नाही. येणाऱ्या मान्सून काळात आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण झाली तर या आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी सर्वच प्रशासकीय यंत्रणाने सज्ज राहावे, यासाठी सर्व विभागाने आपत्ती निवारणाचे नियोजन आराखडे तयार करून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास सादर करावे. त्याचबरोबर तालुका स्तरावर आपत्ती व्यवस्थापनाबाबतच्या बैठकांचे आयोजन करुन योग्य ते नियोजन करावे, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारण तथा निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह (जुने) येथे मान्सून पूर्व तयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, कणकवली प्रांताधिकारी वैशाली राजमाने, कुडाळ प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसिलदार, तालुका गटविकास अधिकारी, सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.

निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय भडकवाड पुढे म्हणाले की, आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी सर्वंच यंत्रणांनी आराखडे तयार करताना प्रत्येक बाबींचा विचारात घेऊन त्याप्रमाणे नियोजन असावे. संभाव्य पूरपरिस्थिती उद्भवल्यास हानी होऊ नये, याबाबत प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्याने आराखड्यांचे नियोजन करावे. संभाव्य पूरपरिस्थितीत जलसंपदा विभागाने पाणी विसर्गाचे योग्य नियोजन करावे. पावसाळ्याच्या काळात घाट रस्ते दरड कोसळून बंद होऊ नये यासाठी बांधकाम विभागाने आपली यंत्रणा सज्ज ठेवावी. त्याचबरोबर मानवी वस्तीच्या ठिकाणी दरड कोसळण्याचा संभाव्य धोका लक्षात घेता, अशी गावे निश्चित करून या ठिकाणी करावयाचा उपाययोजनाचा प्रस्ताव तयार करुन प्रशासनास सादर करावा.

तसेच जिल्ह्यामध्ये विजेचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी महावितरणने सर्व वीजपुरवठा यंत्रणेची तपासणी करावी व आवश्यक त्या ठिकाणाची कामे तातडीने पूर्ण करावी. पूरकाळात बोटींची अत्यंत महत्त्वाची भूमिका असून त्या सुस्थितीत आहेत किंवा कशा याबाबत तपासणी करुन बोटींची दुरस्ती करुन ठेवावी, असे सांगून भडकवाड पुढे म्हणाले की, मान्सून काळात पूरपरिस्थिती उद्भल्यास सर्वंची यंत्रणांनी आपापल्या संपर्क यंत्रणा अद्ययावत कराव्यात व समन्वयाने कामकाज पार पाडण्यासाठी आवश्यक बाबी यांचे नियोजन करावे. त्याचबरोबर एनडीआरएफच्या पथकाच्या संपर्कात राहून उद्भवलेली परिस्थिती सावरण्यासाठी तत्काळ पाचारण करता यावे तसेच एनडीआरएफची पथके ज्या ठिकाणी आवश्यक आहेत, त्या ठिकाणी पोहोचवता यावी यासाठी आतापासूनच तालुका स्तरावरून नियोजन करावेत, असेही ते म्हणाले.

Recent Posts

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

7 minutes ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

21 minutes ago

High alert in Mumbai: मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता; हायअलर्ट जारी

मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…

36 minutes ago

India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…

1 hour ago

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

2 hours ago

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

6 hours ago