राणी बागेतील वाघांना फ्रुट आईस

Share

मुंबई (प्रतिनिधी) : एप्रिल महिन्यातच मुंबईत उन्हाचे चटके लागायला लागले आहेत. मात्र या उष्णतेमुळे माणसचं नाही तर प्राणीही हैराण झाले आहेत. वाढलेल्या तापमानाचा प्राण्यांच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो. यासाठी प्राणी संग्रहालयातील प्राण्यांची विशेष काळजी घेण्यात येत असून राणीच्या बागेत पशूपक्ष्यांना फळांच्या मेजवानीची व्यवस्था करण्यात आली आहे.

भायखळ्यातील माता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयातील प्राण्यांना वाढत्या उन्हाचा त्रास होऊ नये यासाठी विशेष काळजी घेतली जात आहे. उद्यानातील अस्वलांसाठी फ्रुट आईस केकची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती झू बायोलॉजिस्ट अभिषेक साटम यांनी दिली. तर अशीच व्यवस्था वाघ आणि बिबट्यांची केली गेली आहे. पिंजऱ्यातील वाघ आणि बिबट्यांसाठी मांसाहारी फ्रुट आईस केकची मेजवानी देण्यात येत आहे असेही अभिषेक साटम यांनी सांगितले.

प्राण्यांच्या शरिरात थंडगार पदार्थ जावेत यासाठी हत्तींच्या आहारात कलिंगड आणि शहाळी देण्यात येत असून माकडांसाठी खास फळांच्या लॉलीपॉपचा बेत करण्यात आला आहे, अशी माहिती साटम यांनी दिली.

Recent Posts

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

21 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

1 hour ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

1 hour ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

1 hour ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

2 hours ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

2 hours ago