रत्नागिरी, सिंधुदुर्गला वादळाचा तडाखा

Share

रत्नागिरी : कोकणात रत्नागिरी जिल्हयात राजापूर तालुक्यातील पाचल परिसरात बुधवारी सायंकाळी उशिरा चक्रीवादळाचा मोठा फटका बसल्याने खळबळ उडाली. दुर्देवाने पुन्हा एकदा तळकोकणाला जवळ असलेल्या या परिसराला वादळाने गाठले. राजापूर तालुक्याच्या पूर्व परीसराला जोरदार चक्रीवादळ सदृश्य परिस्थितीचा दणका बसला आहे. यामध्ये प्रामुख्याने रायपाटण, पाचल मध्ये जोरदार पडझड झाली आहे. ऐन आंबा काजू हंगाम सुरू होण्याच्या तयारीत असतानाच या वादळाने पुन्हा आंबा,काजू बागांना मोठा दणका दिला असून काही बागा या वादळात उध्वस्त झाल्यात. अनेकांच्या घरांवर झाडे उन्मळून पडली. छपरांवरील कौले, पत्रे उडून मोठे नुकसान झाले असून वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने बुधवारी रात्रीपासुन मोबाईल, दुरध्वनी सेवा व वीज पुरवठा खंडीत झाली आहे.

हवामान खात्याचा अंदाजे व त्या हवाल्याने मत्स्य विभागाकडून देण्यात आलेला चक्रीवादळचा इशारा दुसऱ्या दिवशी रद्द समजावा असे सांगण्यात आले. कोकणात चक्री वादळाचा इशारा नाही असे जिल्हा प्रशासनाकडून सांगितले गेले. जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती कार्यालय यांचीच माहिती अधिकृत समजावी असेही प्रशासनाने सांगितले. पण हा दिलासा फोल ठरल्याचे स्पष्ट झाले आहे.

वादळाचा तडाखा बसलेल्या गावांमध्ये राजापूर तालुक्यातील रायपाटण, पाचल आदी गावांचा सामावेश आहे. सायंकाळी वादळी वारे वाहू लागले. काही क्षणातच वादळी वाऱ्याचे रूपांतर चक्रीवादळ सदृष्य परिस्थितीत झाले व क्षणार्धात अनेक ठिकाणी होत्याचे नव्हते झाले. या वादळात अनेकांच्या घरावर मोठमोठी झाडे उन्मळून पडली. त्यांमध्ये घरांचे आतोनात नुकसान झाले. वादळात घरांवरील कौले पत्रे उडाली. तर, पाचलमधील होळीच्या मांडावर देखील पडझड झाल्याची घटना घडली. रायपाटण ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात एक वृक्ष उन्मळून पडला. तर गावातील बागवाडी, खाडेवाडी, कदमवाडीमध्ये विद्युत वाहिन्यांवर झाडे पडल्याने गावासह लगतच्या परीसरातील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. गुरुवारी दुपारपर्यंत तो सुरळीत झाला नव्हता. परिसरातील मोबाईल सेवाही खंडीत झाली होती. रायपाटण मधील श्री. रेवणसिध्द मठामध्ये देखील वादळात पडझड झाल्याची घटना घडली.

तसेच ठिकठिकाणी उन्मळून पडलेली झाडे दिसून येत होती. तर सध्या होळीचा सण सुरू असून वादळी पावसामुळे ठिकठिकाणच्या होळीच्या मांडाना त्याची झळ पोहचल्याने मांडावरील विराजमान देवतांच्या पालख्या आजुबाजूच्या घरांमध्ये बसवाव्या लागल्या. वादळी पावसाचा जोरदार तडाखा आंबा, काजू पिकांना बसला. अनेक ठिकाणी आंबा-काजूच्या बागा उध्वस्त झाल्या. कलमे वाकून मोडून पडली. बागांचे नुकसान झाले आहे. शासन स्तरावरून या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होऊ लागली आहे.

दरम्यान, याप्रकरणी जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी तात्काळ दखल घेतली असून या परिसरातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून कृषी व महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

Recent Posts

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

1 hour ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

1 hour ago

रोहित शर्मा:रॅग्ज टु रिचेस कहाणी

उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…

2 hours ago

India Pakistan War News : पाकड्यांना भारताचे जोरदार प्रत्युत्तर! कराची बेचिराख!

सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…

2 hours ago

रेस्टॉरंटमधील सर्व्हिस चार्ज: एक अनुचित वसुली

मधुसूदन  जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…

2 hours ago

India-Pakistan war: भारताच्या कारवाईला अमेरिकेचे समर्थन, पाकिस्तानला फटकारले

नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…

3 hours ago