आपले भारतरत्न – लता मंगेशकर

Share

‘भारतरत्न’ हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशाची कीर्ती वाढवणा-या व्यक्तीला भारत सरकारकडून या पुरस्कारानं सन्मानित करण्यात येतं.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर या भारतातल्या सर्वाधिक लोकप्रिय गायिका आहेत. सिनेसंगीतात केलेल्या अजोड कामगिरीबद्दल त्यांना ‘गानकोकिळा’ हा किताब दिला गेला आहे. ‘लतादीदी’ नावानेही त्यांना ओळखले जाते. त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात इ. स. १९४२ मध्ये झाली.

त्यांनी वीसहून अधिक भारतीय भाषांमध्ये ९८० पेक्षा अधिक चित्रपटगीतं गायली आहेत. १९७४ ते १९९१ या काळात सर्वात अधिक गाणी गाण्याचा त्यांच्या विक्रमाची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ने नोंद घेतली आहे. त्यांचा जन्म २८ सप्टेंबर, १९२९ रोजी मध्य प्रदेशातल्या इंदूर शहरात शीख मोहल्ल्यात झाला. आपले वडील

पं. दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून त्यांना संगीताचे प्राथमिक धडे मिळाले. वयाच्या पाचव्या वर्षी त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकात बालकलाकार म्हणून काम करायला सुरुवात केली. २००१ साली त्यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला.

Recent Posts

Mumbai Rain Update: मुंबईकरांना अवकाळी पाऊसाने झोडपले, ‘या’ भागात यलो अलर्ट

मुंबई: दोन दिवसांपासून अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे, मुंबईकरांची चांगलीच धावपळ उडाली आहे. आजही मुंबईत…

8 minutes ago

१६ वर्षांपूर्वीचा बॉम्बस्फोट, पण अजूनही निकाल नाही!

मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल ३१ जुलैपर्यंत लांबणीवर मुंबई : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या २००८ मधील मालेगाव…

17 minutes ago

नालेसफाई नव्हे, ही तर भ्रष्टसफाई! पालकमंत्री आशिष शेलार यांचा थेट हल्ला

मुंबई : "३५ दिवसांत फक्त १० टक्के नालेसफाई? मग उरलेली रक्कम कुठं गेली?" असा थेट…

40 minutes ago

‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरुच! दहापट उत्तर देणार, पाकिस्तानची घाबरगुंडी, केंद्राची सर्वपक्षीय ताकद एकवटली

नवी दिल्ली : भारताच्या यशस्वी ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरही पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन थांबलेले नाही. या पार्श्वभूमीवर केंद्र…

1 hour ago

Operation Sindoor : पाकव्याप्त काश्मीरमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’!

पाकिस्तानची दोन लढाऊ विमाने नष्ट देशभरात मॉकड्रील करण्यापूर्वीच भारताने पहलगाम हल्ल्याचा सूड उगवलाय. पाकिस्तान झोपेतून…

1 hour ago

पाकिस्तानमधील हवाई संरक्षण यंत्रणा भारताच्या ड्रोन हल्ल्यात उद्ध्वस्त

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये २६ नागरिकांची हत्या केली. नंतर…

1 hour ago