भारत-पाकिस्तान आमनेसामने?

Share

कराची : भारत आणि पाकिस्तान हे परंपरागत प्रतिस्पर्धी आमनेसामने येण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (पीसीबी) अध्यक्ष रमीझ राजा यांनी ‘मास्टरप्लॅन’ आखला आहे. दरवर्षी चार देशांची आंतरराष्ट्रीय टी-ट्वेन्टी सीरिज खेळवण्याचा त्यांचा विचार आहे. ही स्पर्धा भारतासह पाकिस्तान, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात व्हावी, असे त्यांना वाटते. तसा प्रस्तावआंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (आयसीसी) मांडणार असल्याचे राजा यांनी सांगितले.

नमस्कार मित्रांनो! भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात दरवर्षी खेळल्या जाणाऱ्या चार देशांच्या टी-ट्वेन्टी आंतरराष्ट्रीय सुपर सीरिजचा मी प्रस्ताव देईन. ही मालिका चार देशांद्वारे रोटेशनच्या आधारावर आयोजित केली जाईल, त्याचे महसूल मॉडेल वेगळे असेल, ज्यामध्ये सर्व सहभागी देश आयसीसीसोबत नफा शेअर करतील, असे ट्विट रमीझ राजा यांनी केले आहे.

भारत आणि पाकिस्तान हे परंपरागत प्रतिस्पर्धी एकमेकांशी भिडतात, तेव्हा मैदानावरील रोमांच शिगेला असतो. जगभरातील चाहतेही या क्षणाची वाट पाहत आहेत. आयसीसी टी-ट्वेन्टी विश्वचषक २०२१ मध्ये दोन्ही संघांची शेवटची गाठ पडली होती. त्यात प्रथमच भारताला हरवण्याची करामत पाकिस्तानने साधली. याआधी कोणत्याही विश्वचषकात पाकिस्तानला भारताला हरवता आले नव्हते.

Recent Posts

भारताकडे तेल, गॅसचा पुरेसा साठा

नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…

7 minutes ago

IPL 2025 स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…

22 minutes ago

मुंबईत मध्य रेल्वेच्या ट्रान्स-हार्बर मार्गावर प्रवाशांची गैरसोय, स्टेशनवर कामाला जाणाऱ्यांची गर्दी

मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली.  ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…

34 minutes ago

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

3 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

3 hours ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

4 hours ago