मुंबई (प्रतिनिधी) : अदाणी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेडने (एईएमएल) मकर संक्रांतीदरम्यान पतंग उडवणाऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. ओव्हरहेड ऊर्जा पारेषण वाहिन्यांजवळ पतंग उडवू नये, असे आवाहन एईएमएलने केले आहे. हा सावधगिरीचा सल्ला सुरक्षित उत्सवाच्या भावनेने जारी करण्यात आला आहे.
पतंगाची तार किंवा मांजा, विजेची वाहक असते. यामुळे जर हा मांजा वीज वहन वाहिन्यांना स्पर्श झाल्यास किंवा वाहिन्यांच्या आकर्षण क्षेत्रात आला तरी त्याद्वारे भरपूर उच्च व्होल्टेज प्रसारित होऊ शकते. पारेषण वाहिन्यांजवळ असुरक्षित पतंग उडवल्याने कोणतीही अप्रिय घटना लक्षात आली किंवा कळली तर एईएमएलच्या १९१२२ या पॉवर हेल्प लाईनवर त्वरित कळवावे, असे आवाहन एईएमएलने ग्राहक आणि नागरिकांना केले आहे. यामुळे कंपनीकडून पुढील आवश्यक कार्यवाही सुरू करता येईल.
तसेच ग्राहक किंवा कंपनीच्या @Adani_Elec_Mum या सामाजिक माध्यमांच्या हँडललादेखील तसेच संकेतस्थळ किंवा अदानी इलेक्ट्रिसिटी अॅपलादेखील भेट देऊ शकतात.
मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अॅक्वा लाईन-३ (Mumbai…
नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…
देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…
मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…
मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…