रत्नागिरी : चिपळूण शहरातील खाटीक गल्ली येथील एका बंद घराला काल (दि. २९ डिसेंबर) भीषण आग लागली. घरी कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या आगीत घरातील विविध वस्तू व साहित्य जळून खाक झाले. त्यात लाखोंचे नुकसान झाले आहे.
आगीची माहिती मिळताच नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाने तत्काळ घटनास्थळी धाव घेत अर्ध्या तासात ही आग आटोक्यात आणली. आग कशामुळे लागली त्याचे कारण समजू शकलेले नाही.
शहरातील खाटीक गल्ली येथील आरशद मेहता सहीबोले हे आपल्या कुटुंबासह परदेशी असतात. त्यांचा फरदीन हा मुलगा त्यांच्या धामणदेवी येथील बहिणीकडे राहतो. त्यामुळे त्यांचे शहरातील घर बंदच असते. त्याच्या घराला आग लागली.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…