सहा महिन्यांत महाराष्ट्रात दगावले २३ वाघ

Share

मुंबई  : महाराष्ट्रात तर अवघ्या सहा महिन्यांत म्हणजे जानेवारी २०२१ ते जुलै २०२१ या कालावधीत २३ वाघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. या २३ वाघांपैकी १५ वाघांचा मृत्यू नैसर्गिक कारणाने, चौघांचा विष वापरामुळे, दोन वाघांचा शिकारीमुळे, एका वाघाचा रेल्वे अपघातात, तर एकाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता.

सरत्या वर्षात म्हणजेच २०२१ मध्ये देशभरात एकूण १२६ वाघांचा मृत्यू झाला. वाघांच्या मृत्यूची संख्या गेल्या एका दशकातील सर्वाधिक आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणकडून या वर्षी २९ डिसेंबरपर्यंतची आकडेवारी जाहीर करण्यात आली. त्या आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की, १२६ मोठ्या वाघांपैकी ६० वाघ हे शिकारी, अपघात आणि संरक्षित क्षेत्राबाहेर मानव-प्राणी संघर्षाला बळी पडले आणि त्यात त्यांना जीव गमावावे लागले.

२०१८ च्या जनगणनेनुसार, भारतात २,९६७ वाघ होते. एनटीसीएने २०१२ पासून सार्वजनिकरित्या वाघांच्या मृत्यूची नोंद ठेवली आहे. यावर्षी वाघांच्या मृत्यूची संख्या दशकातील सर्वाधिक असू शकते, अशी शक्यता मध्यंतरी वर्तवण्यात आली होती. याचे कारण म्हणजे ३० सप्टेंबरपर्यंत तब्बल ९९ वाघांचा मृत्यू झाला होता. यापूर्वी २०१६ मध्ये सर्वाधिक वाघांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली होती. तेव्हा ती संख्या १२१वर होती. दरम्यान, वाघांचे वाढते मृत्यू हे चिंतेचा विषय ठरू शकतात. त्यामुळे वाघांच्या संवर्धनासाठी जास्तीत जास्त प्रयत्न केले जावे, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

Recent Posts

टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्ब ठेवल्याची धमकी

मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…

17 minutes ago

Best Bus fare Hike: नॉन-एसी आणि एसी बससाठी आजपासून मोजावे लागणार इतके पैसे

बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…

21 minutes ago

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

34 minutes ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

54 minutes ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

1 hour ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

1 hour ago