मुंबई (प्रतिनिधी) : कोरोना रुग्णसंख्या नियंत्रणात यायला लागल्यानंतर मुंबईतील निर्बंधांमध्ये शिथीलता आणली गेली. यामुळे १ ते ७ वीच्या शाळा सुरू करण्यात आल्या. मात्र काही शाळांनी ऑनलाईन शिक्षण बंद केले आहे. अशा शाळांना ऑनलाईन शिक्षण देण्याबाबत सूचना दिल्या जातील व नंतर शिक्षण विभागाकडून कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
दरम्यान मुंबईतील महापालिका क्षेत्रातील शाळा सुरू झाल्या असल्या तरी शाळेत विद्यार्थ्यांना पाठवायचे की नाही? हा सर्वस्वी निर्णय पालकांचा असणार आहे. अनेक पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत संमती दिलेले नाही. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण देण्यात यावे अशा शिक्षण विभागाच्या सूचना असतानाही अनेक शाळांनी ऑनलाईन शिक्षण बंद केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. दरम्यान अशा शाळांना पालिकेच्या शिक्षण विभागाकडून आधी ऑनलाईन शिक्षण देण्याबाबत सूचना दिल्या जातील. जर ऑनलाईन शिक्षण सुरू केले नाही तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.
मुंबईत ओमायक्रॉनचा संसर्ग झाल्यापासून अनेक पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्यास संमती दिली नसून ऑनलाईन शिक्षण घेत आहेत. मात्र काही शाळा ऑनलाईन शिक्षण देत नसल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून पालिका अशा शाळांवर कारवाई करणार आहे.
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…