निवडणुकीच्या तोंडावर मनसेत फेरबदल!

Share

औरंगाबाद : महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आगामी निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हा आणि शहर कार्यकारिणीत फेरबदल केले आहेत. दिलीप बनकर, सुमीत खांबेकर आणि वैभव मिटकर यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महानगरप्रमुखपदी बिपीन नाईक यांची नियुक्ती केली आहे. या फेरबदलाने मनसेतील धुसफुस चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी सप्तपदी मंगल कार्यालयात मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. महापालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी पक्षसंघटन मजबूत करा, असा संदेश बैठकीत देण्यात आला. या वेळी माजी आमदार बाळा नांदगावकर, मनसे नेते अभिजीत पानसे आणि दिलीप धोत्रे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीनंतर औरंगाबाद शहर आणि जिल्ह्याची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. राज्य उपाध्यक्षपदी सतनामसिंग गुलाटी यांची नियुक्ती करण्यात आली. जिल्ह्यात एकूण नऊ विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येकी तीन मतदारसंघासाठी एक जिल्हाध्यक्ष नियुक्त करण्यात आला आहे.

औरंगाबाद पूर्व-पश्चिम-मध्य मतदारसंघासाठी सुमीत खांबेकर, गंगापूर-वैजापूर-पैठण मतदारसंघासाठी दिलीप बनकर आणि फुलंब्री-सिल्लोड-कन्नड मतदारसंघासाठी वैभव मिटकर यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. महानगरप्रमुखपदी बिपीन नाईक यांची नियुक्ती करण्यात आली. पूर्व शहराध्यक्षपदी आशिष सुरडकर आणि पश्चिम शहराध्यक्षपदी गजन गौडा पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. ‘मध्य’चे पद रिक्त ठेवण्यात आले आहे. पक्षाचा आढावा घेऊन कार्यकारिणीत फेरपालट केले आहेत. आणखी काही निर्णय घेतले जातील, असे राज ठाकरे यांनी सांगितले.

दरम्यान, विद्यमान जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांना पदावरुन तडकाफडकी हटविण्यात आले. पदभार घेण्यासाठी इच्छुक असलेल्या जुन्या कार्यकर्त्यांची कार्यकारिणीत वर्णी लागली नाही. निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आलेल्या बदलावर काही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Recent Posts

मुंबईच्या विमानतळाजवळ अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, उडाली खळबळ!

मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…

24 minutes ago

India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं सडेतोड उत्तर!

पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…

31 minutes ago

भारताकडे तेल, गॅसचा पुरेसा साठा

नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…

38 minutes ago

IPL 2025 स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित

नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…

53 minutes ago

मुंबईत मध्य रेल्वेच्या ट्रान्स-हार्बर मार्गावर प्रवाशांची गैरसोय, स्टेशनवर कामाला जाणाऱ्यांची गर्दी

मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली.  ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…

1 hour ago

ड्रोन दिसताच चंदिगडमध्ये पुन्हा वाजू लागले सायरन

चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…

3 hours ago