लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही-रोहित शर्मा

Share

नवी दिल्ली (वृत्तसंस्था): एक क्रिकेटपटू म्हणून लोक काय बोलतात याकडे लक्ष देत नाही, अशा शब्दांत भारताचा नवा वनडे कर्णधार रोहित शर्माने ट्रोल करणाऱ्यांना चपराक लगावली आहे.


तुम्ही देशासाठी खेळता तेव्हा तुमच्यावर नेहमीच दबाव असतो. लोक सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही बोलतात. पण आमचे लक्ष खेळावर कायम आहे. लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देत नाही, कारण तुम्ही त्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे संघाला समजून घेणे. मोठ्या स्पर्धांमध्ये लोक जास्त बोलतात, असे रोहितने बीसीसीआय टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
रोहित शर्माने पुढे म्हटले की, विजय मिळवण्यासाठी शक्य ते प्रत्येक जण करतो. प्रत्येक वेळी जिंकण्याचाच प्रयत्न असतो. आपण एकमेकांबद्दल काय विचार करतो, हे महत्त्वाचे आहे. खेळाडूंमध्ये घट्ट बंधन असायला हवे, तरच आपण लक्ष्य गाठू शकू. राहुल भाई आम्हाला नेहमीच मदत करतात.


रोहितला टी-ट्वेन्टी पाठोपाठ वनडे संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आले आहे. पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारताला तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळायची आहे. त्यापूर्वी, २६ डिसेंबरपासून कसोटी मालिका सुरू होत आहे. युएईत झालेल्या टी-ट्वेन्टी विश्वचषकानंतर विराट कोहलीने टी-ट्वेन्टी संघाचे कर्णधारपद सोडले. तेव्हापासून रोहितकडे वनडे संघाचे कर्णधारपद सोपवले जाणार असल्याचे बोलले जात होते. मात्र, कोहली वनडे संघाचे कर्णधारपद सोडण्यास तयार नव्हता. रोहितच्या कर्णधारपदाखाली भारताने चांगली सुरुवात केली आहे. घरच्या मैदानावर टी-ट्वेन्टी मालिकेत न्यूझीलंडचा ३-० अशा फरकाने पराभव केला.

Recent Posts

बॉलीवूड सेलिब्रिटींनी केले भारतीय जवानांच्या शौर्याचे कौतुक!

श्रद्धा कपूर, कंगना रणावत, अनुपम खेर, मधुर भंडारकर, वरुण कोनिडेला यांच्यासह अनेक कलाकारांनी भारतीय जवानांप्रती…

25 minutes ago

टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्ब ठेवल्याची धमकी

मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…

2 hours ago

Best Bus fare Hike: नॉन-एसी आणि एसी बससाठी आजपासून मोजावे लागणार इतके पैसे

बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…

2 hours ago

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

2 hours ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

2 hours ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

3 hours ago