काँग्रेसमुक्त भारत हा भाजपचा संकल्प ममता पूर्ण करणार

Share

मुंबई : काँग्रेसमुक्त भारत हा भाजपचा संकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी भाजप नेत्यांना फारसे प्रयत्न करावे लागणार नाहीत. अजून जन्मासही न आलेल्या तिसऱ्या आघाडीच्या ममता बॅनर्जी हे काम पूर्ण करतील, अशी चिन्हे दिसत असल्याचा टोला भाजपचे राज्य उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी लगावला आहे.

आता यूपीए शिल्लक राहिलेली नाही, हे फक्त जाहीर करायचे बाकी आहे. तसेच राहूल गांधी सतत परदेशात असल्याने ते भाजपविरोधात आंदोलने कशी करणार, अशी टीका बॅनर्जी यांनी केली होती. त्याला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तरही दिले होते.

या वादात आता लाड यांनी उडी मारली आहे. फक्त भाजपविरोध आणि नरेंद्र मोदी यांना विरोध हेच एकमेव उद्दीष्ठ घेऊन मोट बांधणाऱ्या तिसऱ्या आघाडीच्या नेत्यांकडे देशहितासाठी कोणताही ठोस कार्यक्रम नाही. त्यातील अनेक नेते तर फक्त पंतप्रधानपद मिळविण्याच्या इच्छेने पछाडलेले आहेत. मात्र स्वबळावर ते पद मिळविण्याची ताकद त्यांच्यातील एकाकडेही नाही, एकमेकांच्या कुबड्यांचा आधार घेत हिमालयावर जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या अशक्यप्राय कामात त्या सर्वांचा कपाळमोक्ष तर होणार आहेच. मात्र ते देशाचे व जनतेचेही नुकसान करतील ही भीती असल्याचेही लाड म्हणाले.

काँग्रेसचे वरिष्ठ नेतेही प्रादेशिक पक्षांना खिजगणतीतही न धरता मधूनच स्वबळाचा नारा देत असतात. त्यामुळे भाजपविरोधी आघाडीची भाषा करणाऱ्या काँग्रेस, डावी आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस आदी नेत्यांनी प्रथम स्वतःच्या ताकदीचे आत्मपरिक्षण करावे. ज्या कथित सहकाऱ्यांच्या बळावर त्यांना ही उडी मारायची आहे ते आपल्या साथीला आहेत का याची खातरजमा या सर्वच पक्षांच्या विशेषतः काँग्रेस नेत्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत करावी. अन्यथा या मित्रपक्षांनी शेवटच्या क्षणी टेकू काढून घेतला तर दगाबाज मित्रापेक्षा दिलदार शत्रू परवडला, अशी अवस्था या डाव्या पक्षांची होईल, असा टोलाही लाड यांनी लगावला आहे.

Recent Posts

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

18 minutes ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

51 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

2 hours ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

2 hours ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

2 hours ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

2 hours ago