पालघर (प्रतिनिधी) : संत गोन्सालो गार्सिया महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे जागतिक एड्स जागरुकता दिवसाचे औचित्य साधून प्राध्यापक अमित पटेल यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा. सरिथा कुरीयन, डॉ. अरुण माळी, डॉ. नंदकुमार झांबरे, प्रा. इवॉन सखरानी प्रा. अजितकुमार यादव, प्रा. गुणवंत गडबडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एनएसएस कार्यक्रमाधिकारी डॉ. रामदास तोंडे यांनी केले.
याप्रसंगी बोलताना प्रा. अमित पाटील म्हणाले की, भारतीय समाजात अजूनही एड्सबाबत हवी तेवढी जागरुकता नाही. अजूनही भेदभावाची भावना आहे. त्यासाठी समाजात जनजागृती होणे अत्यंत आवश्यक आहे. या आजाराबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. ते दूर करण्यासाठी नेमका हा आजार काय आहे, ते समजून घेणे गरजेचे आहे. केवळ अनैतिक आणि असुरक्षित शारीरिक संबंध ठेवल्यानेच एड्स होतो हा एक गैरसमज आहे. हे खरे असले तरी फक्त हेच एक कारण नाही. अजून अनेक कारणे आहेत, असेही ते म्हणाले.
प्रा. अमित पाटील पुढे म्हणाले की, समाजामध्ये एड्सबाधितांना वेगळ्या नजरेने पाहिले जाते. खरे तर त्यांना समजून घेऊन सहकार्य करण्याची गरज आहे. त्यांना मदतीचा हात दिला पाहिजे. कृपा फाऊंडेशन वसईच्या माध्यमातून हजारो एचआयव्ही बाधितांना मायेचा हात दिला जातो, याचा त्यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला. हा रोग कोणालाही होऊ शकतो. त्यामुळे पुरेशी माहिती घेऊन सजग राहणे गरजेचे आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. अरुण माळी व डॉ. नंदकुमार झांबरे यांनी सदर कार्यक्रम सफल होण्यासाठी परिश्रम घेतले. कोविडचे नियम पाळून हा कार्यक्रम पार पडला.
एक माजी सैन्य अधिकारी, मेजर खासदार, म्हणाला, ‘हम बढे गुन्हेगार, अल्लाह हमारी हिफाजत करे!’ इस्लामाबाद…
इस्लामाबाद : भारताने अतिरेक्यांच्या विरोधात पाकिस्तानमध्ये केलेल्या ऑपरेशन सिंदूर केले. यात पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त…
पाकिस्तान सुपर लीगमधील सामना रद्द, परदेशी खेळाडूंनी केली देश सोडण्याची तयारी! कराची : पाकिस्तानातून आलेल्या…
मुंबई: दोन दिवसांपासून अचानक हजेरी लावलेल्या अवकाळी पावसामुळे, मुंबईकरांची चांगलीच धावपळ उडाली आहे. आजही मुंबईत…
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल ३१ जुलैपर्यंत लांबणीवर मुंबई : संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या २००८ मधील मालेगाव…
मुंबई : "३५ दिवसांत फक्त १० टक्के नालेसफाई? मग उरलेली रक्कम कुठं गेली?" असा थेट…