कणकवली (प्रतिनिधी) : गरीब एसटी कामगारांवर निलंबनाची कारवाई करून भीती दाखविण्याचे प्रकार थांबवा. माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकाही एसटी कामगारांचे निलंबन केलेत, तर याद राखा. निलंबनाचे आदेश रद्दबातल करा. संप शांततेत सुरू आहे, कामगार आपल्या हक्काची लढाई लढत आहेत, त्याला डिवचू नका. सहनशीलतेचा अंत पाहू नका, असा इशारा भाजप आमदार नितेश राणे यांनी दिला.
एसटी कामगारांनी आमदार नितेश राणे यांची त्यांच्या कणकवलीत ओम गणेश निवासस्थानी भेट घेतली असता एसटीचे विभाग नियंत्रक रसाळ यांना फोन करून समज दिली आणि यापुढे निलंबनाची भीती कामगारांना घालू नका, असे बजावले. न्याय हक्कांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा शांततेत सुरू असलेल्या संपाला महामंडळाचे अधिकारी गालबोट लावत असल्याचे आज उघड झाले.
आजवर २५ एसटी कर्मचाऱ्यांना कामावरून निलंबित करण्याचे आदेश विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी दिले. मात्र, अशा निलंबन आदेशाला भीक घालू नका. आपल्या भूमिकेवर ठाम राहा. भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीशी आहे. हा लढा नक्की यशस्वी होईल, असा विश्वास राणे यांनी व्यक्त केला.
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…