Share

निलेश राणे यांचे एसटी कर्मचाऱ्यांना आवाहन

कुडाळ (प्रतिनिधी) : संप मोडून काढण्यासाठी सरकार सगळ्या प्रकारे प्रयत्न करणार, मात्र आपली एकजूट कायम ठेवा. भाजप तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. निलंबन करून सेवा संपवणे एवढी गोष्ट सोपी नाही. आमचा विश्वास न्यायालयावर आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी कुडाळ येथील एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना केले.

एसटी बस कर्मचाऱ्यांबद्दल ठाकरे सरकारला कोणतीही सहानुभूती नाही. त्यामुळे हा संप मिटवण्यासाठी एवढे दिवस घेतले. आता हा संप मोडीत काढण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या सोडल्या जात आहेत. मात्र तुम्ही तुमची एकजूट तशीच ठेवा. ती तुटू देऊ नका. जर ही एकजूट आता तुटली, तर तुम्हाला कधीच न्याय मिळू शकणार नाही.

परिवहन मंत्री अनिल परब यांना वाटतं की, कर्मचारी आपल्या पायापाशी येतील. पण लक्षात ठेवा, कधीही त्यांच्या पायापाशी जाऊ नका. ते आपल्या पायापाशी आले पाहिजेत, हे लक्षात ठेवा. तुम्हाला नोकरीतून काढण्याच्या धमक्याही दिल्या जातील. पण तुमच्या या नोकऱ्यांसाठी आम्ही न्यायालयात जाऊ, असे प्रतिपादन माजी खासदार निलेश राणे यांनी केले. निलेश राणे यांनी कुडाळ एसटी स्थानकात भेट दिली तेव्हा त्यांच्यासमवेत कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे आदी उपस्थित होते.

Recent Posts

टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्ब ठेवल्याची धमकी

मुंबई : टाटा मेमोरियल हॉस्पिटलला शुक्रवार ९ मे २०२५ रोजी एक धमकीचा ई मेल आला.…

57 minutes ago

Best Bus fare Hike: नॉन-एसी आणि एसी बससाठी आजपासून मोजावे लागणार इतके पैसे

बेस्ट बसचे भाडे वाढले, तिकीट दर झाले दुप्पट मुंबई: बृहन्मुंबई विद्युत पुरवठा आणि परिवहन (बेस्ट) ने…

1 hour ago

राज्यातील मत्स्य व्यवसाय क्षेत्राला कृषी दर्जा देण्याचा शासन निर्णय जारी; आजपासून अंमलबजावणी

सवलतीच्या दरात वीज पुरवठा, किसान क्रेडिट कार्ड, बँकांकडून कृषी दरात कर्ज मिळणार! मुंबई : राज्यातील…

1 hour ago

Mumbai Metro 3: मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बीकेसी-वरळी विभागाचे उद्घाटन

मुंबई: मुंबईकरांचा प्रवास सुखकर आणि जलद करण्यासाठी, सुरू करण्यात आलेल्या मुंबई मेट्रोच्या अ‍ॅक्वा लाईन-३ (Mumbai…

2 hours ago

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

2 hours ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

2 hours ago