मुंबईत पहिल्या डोसचे १०० टक्के लसीकरण

Share

मुंबई (प्रतिनिधी) : जगातील सर्वात मोठ्या शहरांमध्ये गणल्या जाणाऱ्या मायानगरी मुंबईने मोठा विक्रम केला आहे. मुंबईत शनिवारी १८ वर्षांवरील वयोगटातील १०० टक्के नागरिकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्याचे उद्दिष्ट गाठले आहे. शनिवारी सकाळी मुंबईत ९२ लाख ३६ हजार ५००वी लस देण्यात आली. याचबरोबर सर्व नागरिकांना पहिला डोस दिला गेला आहे.

मुंबईसह देशभरात १६ जानेवारीला लसीकरण मोहीम सुरू झाली. कोविनच्या आकडेवारीनुसार, शुक्रवारी रात्री नऊपर्यंत मुंबईत ९२ लाख ३५ हजार ६८६ जणांचे पहिल्या डोसचे लसीकरण पूर्ण झाले होते. मुंबईत लस घेण्यासाठी ९२ लाख ३६ हजार ५४६ नागरिक पात्र आहेत. त्यामुळे पहिल्या डोसचे लसीकरण १०० टक्के पूर्ण होण्यास शुक्रवारी केवळ ८६० जणांचे लसीकरण बाकी होते. त्यामुळे शनिवारी सकाळी लसीकरणाला सुरुवात झाल्यावर काही तासांतच १०० टक्के लसीकरणाचे लक्ष्य गाठले गेले. पहिल्या डोसचे १०० टक्के लसीकरण राज्यात प्रथम मुंबईत होत आहे.

जनतेच्या मोठ्या सहभागामुळेच हे शक्य झाले आहे. त्यात राज्य सरकारनेही लसीकरणाच्या धोरणांमध्ये आवश्यक ते बदल करण्याची मुभा दिल्यामुळे पालिकेला वेगाने लसीकरण करता आले, असे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

पहिल्या डोसचे सर्वाधिक ५३ कोटी ६६ लाख ८९५ लसीकरण १८ ते ४४ वयोगटाचे झाले आहे. त्या खालोखाल ४५ ते ५९ वयोगटातील २० लाख ४६ हजार, ६० वर्षांवरील सुमारे ११ लाख ७५ हजार आणि आरोग्य आणि अत्यावश्यक सेवेतील ४ लाख २५ हजार नागरिकांनी पहिली डोस घेतला आहे. शुक्रवारी रात्रीच्या आकडेवारीनुसार मुंबईत दोन्ही डोसचे एकत्रित १ कोटी ५१ लाख ९६ हजार ९२२ लसीकरण झाले आहे.

मुंबईने पहिल्या डोसचे १०० टक्के लसीकरण आकडेवारीनुसार पूर्ण केले असले तरी यात सुमारे १० टक्के लसीकरण हे मुंबईबाहेरील जनतेचे झाले असल्याची शक्यता आहे. त्यामुळे १०० टक्क्यांचे लक्ष्य पूर्ण झाले असले तरी पहिल्या डोसचे लसीकरण सुरूच राहणार असल्याचे काकाणी यांनी स्पष्ट केले.

आता दुसरा डोस पूर्ण करण्याचे लक्ष्य

दोन्ही डोसांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी अजून ३५ टक्के लसीकरण होणे आवश्यक आहे. तेव्हा आता यावर अधिक भर दिला जाईल, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Recent Posts

भारत – पाकिस्तान लढाई सुरू, आयसीएआयने सीए परीक्षा पुढे ढकलल्या

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…

2 minutes ago

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

36 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

1 hour ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

1 hour ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

2 hours ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

2 hours ago