मुंबई (प्रतिनिधी) : महापालिका निवडणूक जवळ येऊ लागली असताना मुंबईत होर्डिंगबाजी पाहायला मिळत आहे. सध्या मोक्याच्या ठिकाणी बेकायदा शुभेच्छा फलक झळकल्याचे दिसत आहेत. मात्र पालिका प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
आगामी पालिका निवडणूक आणि दिवाळीनिमित्त शहरातील चौकाचौकांत, रस्त्यावर राजकीय पक्षांची फलक बाजी सुरू आहे. जाहिरात धोरणानुसार शहरातील काही मोजक्या जागा निश्चित केल्या आहेत. मात्र असे असताना जिथे जागा मिळेल तिथे शुभेच्छा फलक झळकताना दिसत आहेत.
फलक लावण्यासाठी विभाग कार्यालय स्तरावर तसेच पालिका मुख्यालयातून परवानगी घेतल्याशिवाय फलक लावता येत नाहीत. तसेच अधिकृत फलकावर पालिकेची परवानगी प्रत किंवा परवानगी क्रमांक प्रसिद्ध करणे आवश्यक असते; परंतु हा नियम डावलल्याचे दिसत आहे. त्यामुळे कारवाई करण्याची मागणी होत आहे.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…