तीन लाख मुंबईकरांची दुसऱ्या डोसकडे पाठ

Share

मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईतील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिका वेगाने लसीकरण करत असली तरी मुंबईतील तब्बल तीन लाख जणांनी मुदत संपून गेली तरी दुसरा डोस घेतलेला नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पालिकेकडून सर्व २४ वॉर्डमध्ये लाभार्थ्यांचा शोध घेण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे.

दुसरा डोस न घेतलेल्या लाभार्थ्यांची यादी वॉर्ड ऑफिसमध्ये पाठवण्यात आली असून पालिका आपल्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून अशा नागरिकांचा शोध घेत आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. दरम्यान मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात करण्यात आली होती. सुरुवातीला लसीचा दुसरा डोस घेण्यासाठी २८ दिवसांची मुदत होती, मात्र काही दिवसांनंतर केंद्र सरकारच्या निर्देशानुसार ही मुदत ८४ दिवसांपर्यंत वाढवण्यात आली. दरम्यान, दुसरा डोस घेण्यास अनेकजण हलगर्जीपणा करत असल्याचे समोर आले आहे.

एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये, म्हणून पालिका लसीकरण मोहीम राबवते आहे; तर दुसरीकडे लोकांच्या हलगर्जीपणाचा फटका लसीकरण मोहिमेला बसत आहे. दरम्यान, दुसऱ्या डोसची मुदत संपून गेलेल्यांनी आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर लस घेण्याचे आवाहन मुंबई महापालिकेने केले आहे.

Recent Posts

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

4 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

46 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

49 minutes ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

1 hour ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

1 hour ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

2 hours ago