आशा सेविकांचा कल्याण-डोंबिवली मनपावर मोर्चा

Share

कुणाल म्हात्रे

कल्याण : आपल्या विविध मागण्यांसाठी गट प्रवर्तक व आशा सेविकांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर धडक देत मोर्चा काढला. महाराष्ट्र राज्य गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका संघाच्या माध्यमातून हा मोर्चा काढत शासनाच्यावतीने देण्यात आलेली थकीत रक्कम त्वरित देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत काम करणाऱ्या आशा स्वयंसेविकांना मध्यवर्ती सरकारकडून देण्यात येणारे माहिती अहवाल अचूक संकलनाचे दरमहा दोन हजार रुपये एप्रिल २०२९ पासून दिले गेले नाहीत, ते त्वरित देण्यात यावेत. राज्य सरकारने १७ जुलै २०च्या शासन आदेशानुसार गटप्रवर्तकांना तीन हजार रुपये व आशा स्वयसेविकांना दोन हजार रुपये मानधनवाढ केली आहे. एप्रिल २०२१ पासून ही मानधनवाढ आजपर्यंत दिली नाही. ती ताबडतोब देण्यात यावी.

राज्य सरकारने ९ सप्टेंबर २०२१च्या शासन आदेशानुसार १ जुलै २०२१ पासून गटप्रवर्तकांच्या मानधनात बाराशे रुपये व आशा स्वयंसेविकांच्या मानधनात एक हजार रुपये वाढ केली आहे. कोरोना महामारी असेपर्यंत गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना दरमहा ५०० रुपये कोरोना भत्ता देण्याचे मान्य केले आहे. ही रक्कम गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना ताबडतोब देण्यात यावी.

कल्याण-डोंबिवलीमध्ये काम करणाऱ्या आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना मागील वर्षी दिवाळी भाऊबीज दोन हजार रुपये महानगरपालिकेने जाहीर केले होते, ती रक्कम आजपर्यंत गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना देण्यात आली नाही. ही रक्कमही आशा स्वयंसेविकांना यावर्षी देण्यात यावी व या दिवाळीला गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना १० हजार रुपये दिवाळी भाऊबीज (बोनस) देण्यात यावेत. तसेच मोबाईल रिचार्जचे पैसे गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविकांना दिले गेले नाही, ते थकबाकीसह देण्यात यावेत.

आशा स्वयंसेविकांना ज्या कामाचा मोबदला नाही, ते काम सांगू नये किंवा मोबदल्याविना काम देऊ नये. या व इतर मागण्यांसाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या गटप्रवर्तक व आशा स्वयंसेविका यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेवर मोर्चा काढला असल्याचे संघटनेचे उपाध्यक्ष भगवान दवणे यांनी सांगितले.

Recent Posts

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

30 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

32 minutes ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

52 minutes ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

1 hour ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

1 hour ago

High alert in Mumbai: मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता; हायअलर्ट जारी

मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…

2 hours ago