भाईंदर (वार्ताहर) : मीरा-भाईंदर महापालिका प्रभाग समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत सत्ताधारी भाजपने सहापैकी सहा जागांवर विजय मिळवत पुन्हा एकदा आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
मीरा-भाईंदर महापालिकेत ९५ नगरसेवक असून त्यात भाजपचे ६१, शिवसेनेचे २२, तर काँग्रेसचे १२ असे संख्याबळ आहे. तर ६ प्रभाग समिती आहेत. भाजपला स्पष्ट बहुमत असल्याने सर्व समिती सभापतीपदी भाजपचे उमेदवार निवडून येतील, असे संख्याबळ प्रत्येक समितीत होते.
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन निवडणूक पार पडली. त्यात प्रभाग समिती क्र.१ मध्ये नयना म्हात्रे, प्रभाग २ मध्ये पंकज पांडे, ३ मध्ये गणेश शेट्टी, ४ मध्ये डॉ. प्रीती पाटील, ५ मध्ये अनिल विराणी, तर ६ मध्ये मोहन म्हात्रे असे सहा भाजपचे उमेदवार विजयी झाल्याचे पिठासन अधिकारी निधी चौधरी यांनी जाहीर केले. त्यात पंकज पांडे आणि अनिल विराणी बिनविरोध निवडून आले.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…