मुंबई (प्रतिनिधी) : कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली आहे. दैनंदिन आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्या संख्येत आता मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. शिवाय, कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. कोरोनाबाधित रूग्णांच्या मृत्यू संख्येतही घट झाली आहे. मंगळवारी २ हजार ७९१ कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६४ लाख २४ हजार ५४७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४२ टक्के एवढे झाले आहे.
मंगळवारी राज्यात १ हजार ६३८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५ लाख ९४ हजार ८२० झाली आहे. तर मंगळवारी ४९ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे. सध्या राज्यात एकूण २६ हजार ८०५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,१२,४८,८२० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,९४,८२०नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,०९,७९८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ९२८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…
युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…
उमेश कुलकर्णी भारतात आणि जगातही असे अनेक खेळाडू होऊ गेले की ज्यांची कहाणी प्रेरणादायक तर…
सैन्याच्या तिन्ही दलाकडून चौफेर हल्लाबोल! इस्लामाबाद थरथरला! कराची पोर्ट उद्ध्वस्त... पाकिस्तान घाबरला, संपूर्ण देशात ब्लॅक…
मधुसूदन जोशी : मुंबई ग्राहक पंचायत महेश आपल्या कुटुंबाला घेऊन दिल्लीच्या एका हॉटेलमध्ये गेला. बऱ्याच…
नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध भारतीय लष्कराच्या कारवाईला आता अमेरिकेचे समर्थन मिळाले आहे. संयुक्त राष्ट्र अमेरिका म्हणजेच…