कुडाळमध्ये अनधिकृत वाळू उत्खननाला दणका

Share

कुडाळ (प्रतिनिधी) : कुडाळ तालुक्यातील अनधिकृत वाळू उत्खनन होणाऱ्या सोनवडे, वालावल व कवठी येथील सुमारे ३९ रॅम्प कुडाळ तहसीलदार अमोल पाठक यांनी उद्ध्वस्त केले. एकाच वेळी एवढे रॅम्प उद्ध्वस्त करण्याची कुडाळ तालुक्यातील पहिलीच घटना आहे.

कुडाळ तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत वाळू उत्खनन सुरू आहे. राजरोसपणे अनधिकृत वाळू वाहतूक करणारे डंपर गोव्याच्या दिशेने जात असतात मात्र कोणतेही प्रशासन कारवाई करताना दिसत नाही. तथापि, कुडाळ तालुका तहसीलदार अमोल पाठक यांनी तालुक्यातील अनधिकृत वाळू उपसा होणाऱ्या सोनवडे, वालावल व कवठी या गावांमध्ये असलेले अनधिकृत रॅम्पवर सोमवारी एकाच दिवशी कारवाई केली. ही कारवाई दिवसभर सुरू होती.

यामध्ये सोनवडे येथील १४ रॅम्प, वालावल येथील १२ रॅम्प, कवठी येथील १३ रॅम्प नष्ट करण्यात आले आहेत. तहसीलदार अमोल पाठक यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, आता हे रॅम्प उद्ध्वस्त केले आहेत. पुढील कारवाई ही होड्यांवर केली जाईल. अनधिकृत वाळू उत्खनन सुरू आहे ते बंद करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

Recent Posts

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

13 minutes ago

High alert in Mumbai: मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता; हायअलर्ट जारी

मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…

28 minutes ago

India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…

1 hour ago

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

2 hours ago

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

6 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

6 hours ago