कलाकारांचे मानधन दुप्पट, तर गरिबांच्या पगारात कपात का?

Share

मुंबई : कोरोना काळात अनेक बड्या कलाकारांचे मानधन दुप्पट करण्यात आले, मात्र याच क्षेत्रात काम करणाऱ्या पडद्यामागच्या कलाकारांचे म्हणजेच लाईटमॅनसारख्या अनेक गरिबांच्या वेतनात कपात करण्यात आली. बॉलिवूडमध्ये होणाऱ्या या भेदभावाच्या वागणुकीवर अभिनेता रोनीत रॉयने संताप व्यक्त केला आहे.

अभिनेता रोनीत रॉय म्हणाला, ‘मी केलेल्या पडताळणीत मला असे समजले की, अनेक ए-लिस्टर्स कलाकारांचे पगार (मनधन) दुप्पट करण्यात आले आहे. मात्र, गरिबांचे पैसे कापण्यात आले. आमच्या क्षेत्रात ज्याप्रकारे भेदभाव घडत आहे तो खूप चुकीचा आहे.’ तसेच गरीब कुटुंबातील व्यक्तीचा पगार कापणे हे लाजिरवाणे असल्याचे रोनीत म्हणाला.

‘एका लाईटमॅनला त्याचे संपूर्ण घर चालवायचे असते. त्यामुळे त्याचा पगार कापून तुम्हाला काय मिळणार? पगार कमी करायचाच असेल तर बड्या कलाकारांचा करा…गरिबांसोबत असे का वागता? हे वागणे योग्य नाही,’ असे रोनीत रॉय म्हणाला.

रोनीत रॉयची स्वत:ची सेक्युरीटी एजन्सी आहे. रोनीत सर्व बॉलिवूड कलाकारांना सुरक्षा आणि बॉडीगार्ड पुरवतो. कोरोना काळात अनेक कलाकारांनी बॉडीगार्डची गरज नसल्याचे सांगून त्यांना कामावरून कमी केले होते. त्यामुळे रोनीतने १२५ कर्मचाऱ्यांना स्वत: पगार दिला. दीड वर्षाचा काळ खूप कठिण असून या काळात खूप शिकायला मिळाले, असे रोनीत म्हणाला.

Recent Posts

प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन सज्ज करण्याचे आदेश

नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारताच्या प्रादेशिक सैन्याच्या १४ बटालियन…

9 minutes ago

काश्मीरच्या रणभूमीत मुंबईचा जवान शहीद!

देशासाठी प्राणाची आहुती; घाटकोपरच्या मुरली नाईक यांना वीरमरण मुंबई : पाकिस्तानच्या कपटी कारवायांना उधळून लावताना…

11 minutes ago

मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावा

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

48 minutes ago

Dagdu Sheth Ganesh Temple: भारत पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर श्रीमंत दगडू शेठ हलवाईची सुरक्षा वाढवली

मुंबई: 'ऑपरेशन सिंदूर' (Operation Sindoor) अंतर्गत भारतीय लष्कराने काश्मीर आणि पाकव्याप्त काश्मीरमधील कुख्यात 9 दहशतवाद्यांचे…

58 minutes ago

मुंबईच्या विमानतळाजवळ अज्ञात ड्रोनच्या घिरट्या, उडाली खळबळ!

मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…

3 hours ago

India Pakistan War : पाकिस्तानच्या हल्ल्याला भारताचं सडेतोड उत्तर!

पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…

3 hours ago