मुंबई : दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेल्या भाषणानंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी त्यांच्यावर टीका केली आहे.
आम्हाला आता उद्धवजींमध्ये राहुल गांधी स्पष्ट दिसू लागले आहेत. दसरा मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यात आता काहीच फरक राहीलेला नाहीये, हे मी पूर्ण आत्मविश्वासाने सांगू शकतो, कुठलीच शंका नाही, असे ट्विट नितेश राणे यांनी केले आहे.
दसरा मेळाव्याच्या भाषणात उद्धव ठाकरे यांनी विविध मुद्द्यांना हात घातला. या भाषणातून त्यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांच्यावर हल्लाबोल करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. उद्धव ठाकरेंनी केलेल्या या टीकेनंतर भाजपकडूनही चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
आता नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंची तुलना राहुल गांधीशी केलेल्या टीकेनंतर शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते याकडे लक्ष लागले आहे.
मुंबई: ऑपरेशन सिंदूर नंतर भारत पाकिस्तानदारम्यान वाढलेल्या तणावाने आता युद्धाचे स्वरूप धारण केले आहे. याच…
पाकिस्तानचे मनसुबे सुरक्षा यंत्रणांनी धुळीस मिळवले पहलगाम हल्ल्याचा बदला भारताने घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरलं. सर्वच स्तरावरून…
नवी दिल्ली : भारताकडे पेट्रोल, डिझेल, सीएनजी, पीएनजी यांच्यासह आवश्यक त्या सर्व प्रकारच्या इंधन तेलाचा…
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…