ढाका (वृत्तसंस्था) : बांगलादेशात हिंदूंविरोधातील हिंसाचार सुरूच असून शनिवारी सकाळी काही मंदिरांत तोड-फोड झाल्याचे वृत्त होते. शिवाय, हल्लेखोरांनी दोन हिंदू तरुणांची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे हिंसाचारात मरणाऱ्यांची संख्या सहा झाली आहे.
बांगलादेश पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंसाचाराची घटना दक्षिणेकडील बेगमगंज शहरात घडली. तत्पूर्वी, दुर्गा पूजेच्या शेवटच्या दिवशी, म्हणजेच शुक्रवारच्या नमाजनंतर बहुसंख्य समाजातील शेकडो लोक रस्त्यावर उतरले होते. यावेळी, २००हून अधिक लोकांनी इस्कॉन मंदिरावर हल्ला केला. तेव्हा हिंदू समाजाचे लोक विजयादशमीनिमित्त रॅली काढण्याची तयारी करत होते. यावेळी, अज्ञात हल्लेखोरांनी मंदिर समितीच्या कार्यकारिणी सदस्याला मारहाण करून त्याला चाकूने भोसकले. कुराणच्या कथित अपमानाच्या अफवेनंतर बांगलादेशात हिंदूविरोधातील हिंसाचार वाढतच चालला आहे. तत्पूर्वी गेल्या बुधवारी रात्री हाजीगंज येथे एका हिंदू मंदिरावर ५०० हल्लेखोरांनी हल्ला केला होता.
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…
मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…
नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…