कल्याण (वार्ताहर) : जम्मू-काश्मिरमध्ये असलेली शांतता दहशतवाद्यांना सहन होत नसून त्यांच्याकडून सर्वसामान्य लोकांवर होणारे हल्ले यातच दशतवाद्यांची निराशा दिसून येत आहे. त्यामुळे पाक पुरस्कृत दहशतवाद्यांच्या नापाक योजना कधीही यशस्वी होणार नाहीत असे प्रतिपादन भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी केले.
काश्मीरमधील दोन शिक्षकांची दहशतवाद्यांकडून हत्या झाली. या घटनेच्या निषेधार्थ कल्याणमधील मुंबई विद्यापीठ उपकेंद्राजवळ निषेध व्यक्त करण्यात आला. भाजप शहर सचिव राजेश सिंग यांनी आयोजित केलेल्या या निषेध मोर्चात भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे, ओबीसी मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल शेलार, उत्तर भारतीय मोर्चाचे शहर सचिव अश्विन शुक्ला, उपाध्यक्ष सच्चीदानंद दुबे, अजय गुप्ता, वॉर्ड क्र ४ अध्यक्ष नीरज मिश्रा, ललित सारंग, भास्कर तीठे, राजकुमार सारस्वत, किशोर चौधरी, आलोक उपाध्याय, प्रा. आर आर त्रिपाठी, दीनानाथ तिवारी, श्रीकांत उपाध्याय, सी एस पांडे, राम अवध यादव, पी पी सिंग, श्रीनाथ सिंग, प्रमोद सिंग यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवी दिल्ली : भारत - पाकिस्तान दरम्यान वाढत असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल २०२५ स्पर्धा अनिश्चित…
मुंबई: आजची सकाळ मध्य रेल्वेने प्रवास करणाऱ्या तमाम चाकरमान्यांसाठी त्रासदायक ठरली. ट्रान्स-हार्बर लाईन आणि मेन…
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…