Share

दुबई (वृत्तसंस्था) : इंडियन प्रीमियर लीगच्या २०२१ हंगामाची अंतिम लढत दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शुक्रवारी दुबई क्रिकेट मैदानावर रंगेल. माजी विजेता चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात मेगा फायनल होणार आहे. कुठला संघ ट्रॉफी पटकावत यंदा आयपीएलचे सोने लुटणार? याची उत्सुकता जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये आहे.

यंदाच्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनीचा संघ इयॉन मॉर्गन आणि सहकाऱ्यांशी दोन हात करेल. या मोसमाचा विचार करताना चेन्नईने १४ पैकी ९ सामने जिंकताना १८ गुणांसह गुणतालिकेत दुसरे स्थान मिळवले. वास्तविक पाहता सलग तीन पराभवांचा सामना करावा लागला नसता, तर सुपरकिंग्जना पहिला क्रमांक राखण्यात प्रयास पडले नसते.

मात्र, बाद फेरीतील (प्ले-ऑफ) क्वॉलिफायर १ मध्ये त्यांनी टॉपला असलेल्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळ उंचावला आणि १४ व्या हंगामात नवव्यांदा अंतिम फेरीत धडक मारली. २०१०, २०११ आणि २०१९ अशी तीन जेतेपद मिळवलेल्या चेन्नईला दोन हंगामांनंतर आणखी एक ट्रॉफी पटकावण्याची संधी आहे. यंदा दोन्ही सामन्यांत चेन्नईने कोलकाताला हरवले आहे. त्यामुळे आमने-सामने पाहता धोनीच्या टीमचे पारडे जड आहे.

Recent Posts

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

6 minutes ago

High alert in Mumbai: मुंबईवर हल्ला होण्याची शक्यता; हायअलर्ट जारी

मुंबई पोलिसांच्या सर्व सुट्ट्या रद्द मुंबई : भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्याने मुंबईत हायअलर्ट घोषित करण्यात…

21 minutes ago

India Pakistan war : भारत-पाकिस्तान यांच्यातील वादामध्ये हस्तक्षेप करणार नाही, अमेरिकेचे मोठे विधान

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी खूप तणाव वाढले. पाकिस्तानने ऑपरेशन सिंदूरनंतर जम्मू, पठाणकोट…

1 hour ago

India-Pakistan War: राजौरी-पूंछमध्ये LOC वर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये रात्रभर ब्लॅकआऊट

नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तान यांच्यात गुरूवारी तणाव वाढला. पाकिस्तानकडून जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरवर स्ट्राईक…

2 hours ago

रोहित पर्व विसावले

भारतीय क्रिकेट इतिहासामधील महत्त्वाचे पान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती घेतली.…

6 hours ago

युद्ध सुरू : नागरिकांसाठी जागरूकता

युद्धजन्य सावट: नागरिकांनी खालील बाबी तात्काळ अमलात आणाव्यात! भारत-पाकिस्तान दरम्यान पुन्हा एकदा संघर्ष पेटलेला आहे.…

6 hours ago