नेरळ (वार्ताहर) : मिनिट्रेनची माथेरान-अमन लॉज-माथेरान या शटल सेवेची वाहतूक करणाऱ्या रेल्वे प्रशासनाने बनवेगिरी सुरू केली आहे. पर्यटक प्रवाशांची गर्दी असतानाही एक प्रवासी डबा कमी लावला जात असून तो माथेरान स्थानकात उभा ठेवण्यात आला आहे. दरम्यान, तो प्रवासी डबा तत्काळ लावण्यात यावा, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर शटल सेवेचा एक डबा कमी करण्यात आला. अमन लॉज ते माथेरान स्टेशनपर्यंतची रेल्वेची शटल सेवा पर्यटक आणि स्थानिकांसाठी मोठी सुलभ व फायदेशीर ठरली आहे. सुरुवातीला पाच सेकंड क्लासच्या डब्यांनी सुरू केलेली मिनी ट्रेनची शटल सेवा तीन डब्यांवर आली होती. दरम्यान, गेल्या आठवड्यापासून आणखी एक डबा कमी केल्याने अवघे दोन सेकंड क्लासचे डबे लावून गाडी चालवली जात आहे. त्यामुळे ९० ऐवजी केवळ ६० प्रवासीच प्रवास करू शकतात.
माथेरान शहर काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अध्यक्ष मनोज खेडकर यांच्या सहीचे पत्रासोबत माथेरान रेल्वेचे स्टेशन मास्तर जी. एस. मीना यांची भेट घेऊन तत्काळ डब्यांची संख्या वाढवण्याची मागणी केली. या वेळी नगरसेवक शिवाजी शिंदे, महिला काँग्रेस अध्यक्षा वर्षा शिंदे, नागरी पत संस्थेचे सभापती हेमंत पवार, धनगर समाजाचे अध्यक्ष राकेश कोकले सामाजिक कार्यकर्ते नितीन शाह आदी उपस्थित होते.
माथेरानला वाहन बंदी आहे. टॅक्सी स्टँड गावापासून तीन किलोमीटर दूर असल्याने मिनी ट्रेनची शटल सेवा सर्वांना सुलभ आहे. लवकरच दिवाळी सीजन सुरू होत आहे. डब्यांची संख्या वाढली पाहिजे काँग्रेस पक्षाच्या मागणीची दाखल डीआरएम ऑफिसने घेतली असून मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी लवकरात लवकर नेरळ यार्डात डबे माथेरानला पाठवण्यात येतील, असे सांगितले.
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…