समीर वानखेडेंना लवकरच समन्स

Share

मुंबई : एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना मुंबई पोलीस समन्स पाठवणार असल्याचे समजते. काही दिवसांपुर्वी खुद्द समीर वानखेडे यांनीच राज्याच्या पोलीस महासंचालकांकडे आपल्यावर काही पोलीस पाळत ठेवत असल्याचा आरोप केला होता. त्याच तक्रारीनंतर वानखेडे यांना समन्स पाठवले जाणार आहेत. त्याच तक्रारीचा भाग म्हणून त्यांची चौकशी केली जाईल.

मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी ११ ऑक्टोबर रोजी, आपल्यावर पाळत ठेवली जात असल्याचा दावा केला होता. त्यांनी याबाबत मुंबई पोलिसात तक्रार देखील केली होती. तसेच मुंबई पोलिसांना याबाबतचे सीसीटीव्ही फुटेजे देखील मिळाल्याची माहिती वानखेडे यांनी दिली होती. वानखेडे यांनी स्वत: त्याबाबतचे पुरावे पोलिसांना दिलेले आहेत. या सर्व प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी दोन पोलिसांची चौकशीदेखील केली. तसेच आता मुंबई पोलीस वानखेडे यांना समन्स पाठवणार आहे. त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार मुंबई पोलीस चौकशी करणार असल्याची माहिती आहे.

मलिक यांच्या आरोपांना दिले उत्तर

एनसीबीने २ ऑक्टोबरला क्रूजवर टाकलेला छापा, त्यातून अटक करण्यात आलेला शाहरूख खानचा मुलगा आर्यन खान आणि या सर्व प्रकरणावर नवाब मलिक यांनी केलेले आरोपांबाबत राज्यात सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मलिक यांनी आपला जावई समीर खान याला एनसीबीने अडकवल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी न्यायालयाचा अहवाल आणि त्यापाठोपाठ समीर वानखेडे यांचा नंबर देखील जाहीर केला आहे. त्यानंतर आता समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी यावेळी या प्रकरणावर स्पष्टपणे भूमिका मांडली आहे. वानखेडे म्हणाले, ‘सध्या हे प्रकरण वरच्या कोर्टात आहे. अशा प्रकरणामध्ये आपण त्यावर काही बोलू शकत नाही’.

Recent Posts

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान IPL बाबत बीसीसीआय घेणार मोठा निर्णय

मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…

5 minutes ago

India-Pak Tension: भारत-पाकिस्तान तणावादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावली तात्काळ बैठक

मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…

47 minutes ago

भारत – पाकिस्तान लढाई, भारतात २४ विमानतळ बंद

नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…

50 minutes ago

भारताने पाकड्यांचे कंबरडे मोडले, पाकिस्तानचे ५० ड्रोन केले उद्ध्वस्त

नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…

1 hour ago

सीमा सुरक्षा दल सतर्क, अतिरेक्यांच्या घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला

सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…

1 hour ago

पाकिस्तानच्या लष्करात बंडखोरी!असीम मुनीरला पाकिस्तानतच बेड्या, लष्करप्रमुख पदावरून हटवलं

मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…

2 hours ago