पंढरपूर : पंढरपूर येथील एसटी आगारातील दशरथ गिड्डे या कर्मचाऱ्याने राहत्या घरी आज पहाटे गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही. दशरथ गिड्डे हे पंढरपूर येथील एसटी आगारात यांत्रिकी विभागात गेल्या अनेक वर्षापासून काम करत होते. आज पहाटे त्यांनी आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली.
दशरथ गिड्डे यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले आहेत. मूळचे मोहोळ येथील असलेले गिड्डे मागील काही दिवसांपासून मानसिक तणावामध्ये होते. त्यातूनच त्यांनी ही आत्महत्या केली असावी अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मागील काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने कर्मचारी तणावात आहेत. त्यातूनच अनेक ठिकाणी आत्महत्यांचे सत्र सुरू झाले आहे. अशातच आज पंढरपुरातील यांत्रिक विभागात काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याने एसटी विभागामध्ये खळबळ उडाली आहे.
अहमदनगरमधील संगमनेर बस डेपोमध्ये सप्टेंबर महिन्यात हा प्रकार घडला. मृतक बस चालकाचे नाव सुभाष तेलोरे असे होते. चालक सुभाष तेलोरे यांनी अहमदनगरमधील संगमनेर बस डेपो येथे पहाटेच्या सुमारास एसटी बसमध्येच गळफास घेत आयुष्य संपवले.
एसटी चालक सुभाष तेलोरे हे पाथर्डी तालुक्यातील कोल्हार गावातील निवासी असून ते एसटी महामंडळात चालक पदावर कार्यरत होते. त्यांच्यावर कर्ज होते आणि कर्जाचा बोजा वाढत असल्याने त्यांनी इतकं टोकाचं पाऊल उचलत आपलं आयुष्य संपवलं.
त्याआधी ऑगस्ट महिन्यात धुळ्यातील एसटी चालक कमलेश बेडसे यांनी गळफास घेत आत्महत्या केली. अनियमित पगारामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा दावा केला जात आहे. त्यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर संतप्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी आंदोलनही केले होते.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…
सांबा : भारत - पाकिस्तान दरम्यान लढाई सुरू असतानाच जम्मू काश्मीरमधील सांबा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर…
मुंबई: भारत पाकिस्तान युद्धाला सुरुवात झाली आहे. भारताने पाकिस्ताननं केलेल्या सगळ्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर दिलं…