मुंबई (प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेतील सभा प्रत्यक्षपणे घ्या ही मागणी भाजप सातत्याने करत आहे, असे असताना सत्ताधारी शिवसेना मात्र प्रत्यक्ष बैठकीपासून पळ काढत असल्याचा आरोप भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.
मुंबईतील अनेक निर्बंध शिथिल झाल्यानंतर आणि लोकल प्रवासाला ही मुभा दिल्यानंतर पालिकेतील सभा प्रत्यक्ष का नको म्हणून भाजपने सातत्याने सत्ताधारी पक्षाकडे पाठपुरावा केला आहे. मात्र अद्यापही प्रत्यक्ष बैठकीला सुरुवात झाली नाही. यापूर्वी देखील याच मागणीसाठी भाजप सदस्यांनी स्थायी समिती अध्यक्षांकडे आंदोलन केले होते. असे असताना देखील भाजप सदस्यांना बुधवारी बैठकीत बसू दिले नाही.
दरम्यान या मागणीसाठी भाजपने उच्च न्यायालयात देखील याचिका केली होती. यात सभा प्रत्यक्ष घेण्यास परवानगी देण्यात आली आहे. असे असतानाही सत्ताधारी न्यायालयाचा अवमान करत असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. मुंबई महापालिकेत जो भ्रष्टाचार सुरू आहे तो उघड होऊ नये म्हणून सत्ताधारी प्रत्यक्ष बैठकीपासून पळ काढत आहे का? असा सवाल शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
कोरोना काळात व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेण्यास सुरुवात झाली. या बैठकीत सविस्तर चर्चा करता येत नसून विरोधकांना ऐकू देखील येत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष बैठका घ्या ही मागणी भाजपने केली होती. तर स्थायी समितीने न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी याचिका न्यायालयात दाखल करणार असल्याचेही शिंदे म्हणाले.
पालिकेतील सभा प्रत्यक्ष घेतल्या जाव्यात, या मताचे आम्ही देखील आहोत. त्यासाठी सरकारला तसे पत्र देखील लिहिले आहे. मात्र सरकारने तूर्त तरी पालिकेच्या सभा प्रत्यक्ष न घेता व्हिसीद्वारे घ्याव्यात, असे निर्देश दिले आहेत. या निर्देशानुसारच सभा घेण्यात येत आहे. – यशवंत जाधव, स्थायी समिती
चंदिगड : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवार ९ मे रोजी…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया…
मुंबई: इंडियन प्रीमियर लीगचा सध्याचा हंगाम मध्येच रद्द केला जाऊ शकतो. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतीय क्रिकेट…
मुंबई: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पाहता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपात्कालीन सुरक्षा बैठक…
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढाई सुरू आहे. या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने…
नवी दिल्ली: पाकिस्तानच्या हल्ल्याला उत्तर देताना भारताने जम्मूपासून ते जैसलमेरपर्यंत पाकिस्तानच्या ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला…